शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मतदार याद्यांमधील घोळ सुरूच; इच्छुक उमेदवारांचीही नावे वगळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:49 PM

निवडणूक विभागाकडे केल्या तक्रारी

नवी मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ वर्षानुवर्षे वाढतच चालल्याने त्याबाबत सर्वपक्षीयांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तर एक महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे घोळ असल्याने अनेक मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात फेकले गेले आहेत. असे घोळ जाणीवपूर्वक केले गेल्याची शक्यता मतदारांकडून वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात राजकीय घडामोडी सुरू असतानाच, नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ असल्याचे समोर आले आहे. अशा चुका निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून केल्या गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीमध्ये अनेक प्रभागांतील इच्छुक उमेदवारांचीही नावे वगळण्यात आली आहेत. तर अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसºया प्रभागातील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकारात एकाच कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या प्रभागात विभागल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी गावठाणातील मतदार कॉलनीतल्या प्रभागात नोंदवले गेले आहेत. यामुळे प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधत मतदानासाठी चांगलीच पायपीट करावी लागणार आहे. मात्र मतदार याद्यांमधील घोळामुळे आपल्या राहत्या प्रभागातील लोकप्रतिनिधी निवडीचा हक्क गमावून दुसºया प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याचा प्रसंग मतदारांवर ओढावणार आहे. याची तीव्र नाराजी मतदारांकडून व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीवेळी मतदारांची नावे योग्य प्रभागात असताना, अचानक त्यामध्ये बदल झालेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यावरून घणसोली नोडमधील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाºयांची बैठक झाली. या वेळी भाजपचे कृष्णा पाटील, सुरेश सकपाळ, सचिन शिरसाठ, विजय खोपडे, नितीन रांजने, राजू गावडे, सखाराम सुर्वे, मंगेश साळवी आदी उपस्थि होते. यामध्ये त्यांनी मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेऊन तशा पद्धतीचे पत्र पालिकेला दिले आहे. यानंतरही मतदार याद्यांमध्ये घोळ कायम राहून एका प्रभागातील मतदार दुसºया प्रभागात नोंदले गेल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा मतदारांनी घेतला आहे. घणसोलीतील वैभवशाली सोसायटीतील १८० पैकी केवळ ४० मतदारांची नावे असून उर्वरित १४० मतदारांची नावे कोणत्याच यादीत सापडत नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे, तर प्रभाग ३३ मधील मतदार ३६ मध्ये तर ३४ चे मतदार इतर प्रभागांच्या यादीत गेले आहेत.

सानपाडा येथेही ७४ क्रमांकाच्या प्रभागातील मतदार ७५ अथवा ८३ प्रभागातील यादीत नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये शेकडो मतदार एका प्रभागातून दुसºया प्रभागात फेकले गेले आहेत. या प्रकरणी शिरीष पाटील यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. तर वाशीत प्रभाग ६२ मधील मतदार प्रभाग ५८ मध्ये अथवा इतरत्र ढकलले गेले आहेत. या प्रकरणी विजय वाळुंज यांनी संताप व्यक्त करत पालिकेकडे तक्रार केली आहे. तर मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश कदम यांनीही मतदार याद्यांमधील घोळावर आक्षेप घेतला आहे.

याद्यांमधील घोळाच्या आडून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाली असून त्यासंबंधीचे पुरावे पालिकेकडे सादर करणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. एका प्रभागातून दुसºया प्रभागात मतदार नोंदणी झाल्याचा फटका स्थानिक उमेदवारांना बसणार आहे. यामुळे मतदार याद्यांमध्ये घडलेला घोळ सुधारून सर्व मतदार त्यांच्या मूळ प्रभागात नोंदित करावेत, अशी मागणी होत आहे.सूचना व हरकतींसाठी १६ मार्चपर्यंत मुदतप्रारूप मतदार याद्यांसंदर्भात सूचना व हरकती करण्यासाठी पालिकेने १६ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. यादरम्यान शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही पालिका मुख्यालयातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार असल्याचे पालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNavi Mumbaiनवी मुंबई