शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

फेरीवाल्यांवर कारवाईला पालिका असमर्थ, न्यायालयाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 07:07 IST

शहरात अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्ते, पदपथ बळकावले जात असतानाही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात पालिका असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरात अनधिकृत फेरीवाल्यांकडून रस्ते, पदपथ बळकावले जात असतानाही त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात पालिका असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. नुकतेच न्यायालयाने शाळा, रुग्णालये व रेल्वेस्थानके यांच्याबाहेर ना फेरीवाला क्षेत्राची हद्द घोषित केली आहे. त्यानुसार पालिकेने सीमांकन करून देखील ना फेरीवाला क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याचे दिसत आहे.एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर मुंबई व उपनगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्थानकाचा परिसर, मुख्य रस्ते, पदपथ यावर अनधिकृत फेरीवाल्यांनी ताबा मिळवला आहे. परिणामी पादचारी व वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर नुकत्याच झालेल्या सुनावणीत शाळा, धार्मिक स्थळे, रेल्वेस्थानक यापासून दीडशे मीटरचा क्षेत्र ना फेरीवाला घोषित करण्यात आला आहे. तशा सूचना न्यायालयाने सर्वच महापालिकांना दिल्यानंतर नवी मुंबईतही आवश्यक ठिकाणी सीमांकन करण्यात आले आहे. मात्र सीमांकन होवून देखील त्याठिकाणी अनधिकृत फेरीवाले जैसे थे असल्याचे दिसत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही सीमांकन न करता फेरीवाल्यांना मोकळे आंदण दिले आहे. यावरून अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात पालिका असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. सुमारे एक वर्षापूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात सरसकट अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाया केल्या जात होत्या. तेच अधिकारी सध्या फेरीवाल्यांसोबत हितसंबंध जोपासत केवळ दिखाव्यासाठी कारवाया करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.शहरातील बहुतांश रस्ते, पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे राहिले नाहीत. याप्रकरणी सामान्य नागरिकाने देखील पोलिसांकडे तक्रार केल्यास संबंधित फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल होवू शकतो.अशावेळी अनधिकृत फेरीवाल्यांना पाठिशी घालणाºया पालिका अधिकाºयाला देखील चौकशीला सामोरे जावे लागू शकते. तर अधिकाºयांचा हा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवावर देखील बेतू शकतो.रेल्वेस्थानकाच्या आवारात उघड्यावर खाद्यपदार्थ बनवले जात असून त्याकरिता गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. यासाठी काही व्यावसायिकांनी अनधिकृत फेरीवाल्यांना मार्जिनल स्पेस भाड्याने दिले असून वीज देखील उपलब्ध करून दिलेली आहे. अशांवर देखील कारवाई होणे अपेक्षित असताना संबंधित सर्वच प्रशासनाकडून डोळेझाक होताना दिसत आहे.अनधिकृत फेरीवाल्यांमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडलेले असून त्यात गुन्हेगारी टोळ्यांचाही समावेश आहे. घणसोली रेल्वेस्थानक व परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्यावरून नाग्या भाई नावाच्या गुंडाने मनसे पदाधिकाºयाला धमकावल्याचा देखील प्रकार घडला आहे, तर वाशी रेल्वेस्थानकाबाहेर फेरीवाल्यांची हकालपट्टी केल्याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीने आंदोलक मनसे कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा प्रकार घडलेला आहे. त्यानंतरही प्रशासन अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेच्या अधिकाºयांकडून न्यायालयाचा अवमान होत आहे. रेल्वेस्थानकांबाहेर सीमांकन करून देखील त्याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांना प्रशासनाच्याच काही अधिकाºयांकडून अभय मिळत आहे. त्यामागे अर्थकारण दडले असून त्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे. या सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित असतानाही पोलीस मनसे कार्यकर्त्यांनाच नोटिसा बजावत असल्याचे आश्चर्य आहे.- गजानन काळे,शहरअध्यक्ष, मनसे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई