शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, मग पक्ष फोडाफोडी का करताय?; उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 17:40 IST

आम्ही स्थानिकांच्या भावना जपतो, त्यांच्या भावनांशी खेळत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

कमळगौरी हिरु पाटील संस्था, तळोजा ह्यांच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालया’चं उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी चांगले वकील ही तळागाळातील समाजाची गरज झाली असून ह्या महाविद्यालयातून निष्णात वकीलांची फौज निर्माण होतील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

पनवेलमधील शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत आहे. आपण सर्व शिवसेनेच्या मागे पुन्हा खंबीर उभे राहून येत्या निवडणूकीत मावळचा खासदार शिवसेनेचा निवडून आणणार असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचं नाव दि. बा. पाटील दिल होतं. त्याचं पुढे काय झालं?, अजूनही ते का दिल गेलं नाही?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आम्ही स्थानिकांच्या भावना जपतो, त्यांच्या भावनांशी खेळत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

आजपर्यंत भाजपाएवढा खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आलेला नाही. ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करताय?, असं म्हणत शिवसेना नसती आणि शिवसेनेनं तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता, तर तुम्हाला खांदा द्यायलाही चार लोक आली नसती, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. भाजपा हा पक्ष नाही ती सडकी, कुजकी वृत्ती आहे. देशातून हि वृत्ती आपल्याला तडीपार करावीच लागेल. तर आणि तरच आपल्या देशात ‘अच्छे दिन’ येतील, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. तसेच येणारी निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशीच होणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबईElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४