शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

वडोदरा मार्गामुळे आदिवासी भूमीहीन?

By admin | Updated: December 31, 2014 22:41 IST

आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

पालघर : आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. परंतु या प्रकल्पामुळे पालघर तालुक्यातील अल्पभुधारक व आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी जाऊन ते भूमीहिन होणार असल्याने या मार्गात बदल करावा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.केंद्राने प्रस्तावित मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग हा पश्चिम रेल्वेच्या विरार ते गुजरात मार्गासह मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या मधल्या भागातून जाणार असून रेल्वेच्या पूर्व बाजूने सध्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर चे काम सुरू आहे. याच बाजुने बुलेट ट्रेनचा मार्गही टाकण्यात येणार आहे. दळणवळणामध्ये सुधारणा करण्याचा उद्देश ठेवून एक्स्प्रेस मार्गाचे नियोजन करण्यात येत असताना याच भागात कित्येक वर्षापासून सुरू केलेले सागरी महामार्गाचे काम मात्र संथगतीने सुरू असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.प्रस्तावित एक्स्प्रेस मार्ग हा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळून प्रस्तावित असून या महामार्गाचे सन २०२० पर्यंत बारा पदरी विस्तारीकरण होणार असल्याने मुंबई-वडोदरा मार्ग राष्ट्रीय महामार्ग लगतच करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे सचीव प्रवीण पाटील यांनी केली. या एक्स्प्रेस मार्गाला गेल्या दोन दशकापासून वेगवेगळे प्रस्ताव पुढे आले मात्र या प्रस्तावाला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध झाला होता. त्यानंतर सन २०१२ पासून या एक्स्प्रेस मार्गाकरीता सर्व्हेक्षणाचा प्रयत्न निहे येथे झाला. तो प्रयत्न शेतकऱ्यानी एकमताने हाणून पाडला.मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग प्रकल्पामुळे संपादीत करण्यात येणारी जमीन ही सिंचन क्षेत्राखाली सुपीक जमीन असल्याने अल्पभूधारक व आदिवासी शेतकरी भूमीहीन होणार आहेत. तसेच अनेक गावातील घरांचे विभाजन होवून शेतजमीनीही विभाजन होणार आहे. या विभाजनामुळे गावाचे जमीनीचे दोन भाग पडल्याने शेतकऱ्यांना विकासापासून वंचीत राहावे लागणार आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र अडवले जाऊन शेती पाण्यावाचुन बंजर होणार असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्कृष्ट हवामान व प्रदूषण विरहीत असलेल्या या हरीत पट्ट्यातून वाहनांच्या वाहतुकीमुळे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण वाढून त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागणार असल्याने हा एक्स्प्रेस मार्ग राष्ट्रीय महामार्गालगत जागेतून न्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकाराद्वारे दिला आहे. (वार्ताहर)