शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वडोदरा मार्गामुळे आदिवासी भूमीहीन?

By admin | Updated: December 31, 2014 22:41 IST

आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

पालघर : आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. परंतु या प्रकल्पामुळे पालघर तालुक्यातील अल्पभुधारक व आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी जाऊन ते भूमीहिन होणार असल्याने या मार्गात बदल करावा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.केंद्राने प्रस्तावित मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग हा पश्चिम रेल्वेच्या विरार ते गुजरात मार्गासह मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या मधल्या भागातून जाणार असून रेल्वेच्या पूर्व बाजूने सध्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर चे काम सुरू आहे. याच बाजुने बुलेट ट्रेनचा मार्गही टाकण्यात येणार आहे. दळणवळणामध्ये सुधारणा करण्याचा उद्देश ठेवून एक्स्प्रेस मार्गाचे नियोजन करण्यात येत असताना याच भागात कित्येक वर्षापासून सुरू केलेले सागरी महामार्गाचे काम मात्र संथगतीने सुरू असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.प्रस्तावित एक्स्प्रेस मार्ग हा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळून प्रस्तावित असून या महामार्गाचे सन २०२० पर्यंत बारा पदरी विस्तारीकरण होणार असल्याने मुंबई-वडोदरा मार्ग राष्ट्रीय महामार्ग लगतच करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे सचीव प्रवीण पाटील यांनी केली. या एक्स्प्रेस मार्गाला गेल्या दोन दशकापासून वेगवेगळे प्रस्ताव पुढे आले मात्र या प्रस्तावाला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध झाला होता. त्यानंतर सन २०१२ पासून या एक्स्प्रेस मार्गाकरीता सर्व्हेक्षणाचा प्रयत्न निहे येथे झाला. तो प्रयत्न शेतकऱ्यानी एकमताने हाणून पाडला.मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग प्रकल्पामुळे संपादीत करण्यात येणारी जमीन ही सिंचन क्षेत्राखाली सुपीक जमीन असल्याने अल्पभूधारक व आदिवासी शेतकरी भूमीहीन होणार आहेत. तसेच अनेक गावातील घरांचे विभाजन होवून शेतजमीनीही विभाजन होणार आहे. या विभाजनामुळे गावाचे जमीनीचे दोन भाग पडल्याने शेतकऱ्यांना विकासापासून वंचीत राहावे लागणार आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र अडवले जाऊन शेती पाण्यावाचुन बंजर होणार असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्कृष्ट हवामान व प्रदूषण विरहीत असलेल्या या हरीत पट्ट्यातून वाहनांच्या वाहतुकीमुळे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण वाढून त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागणार असल्याने हा एक्स्प्रेस मार्ग राष्ट्रीय महामार्गालगत जागेतून न्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकाराद्वारे दिला आहे. (वार्ताहर)