शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

थर्टी फर्स्टला ४२४ चालकांवर कारवाई , वर्षभरात ३७०० मद्यपींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 07:08 IST

मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही चालकांना शिस्त लागत नसल्याने अवघ्या थर्टी फर्स्टच्या रात्रीत ४२४ मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा अपघातांमध्ये मृतांची संख्या वाढत असल्याने मद्यपान करून वाहन चालवणाºयांविरोधात पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. परंतु पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील मद्यपी चालकांना वाहतुकीची शिस्त अंगवळणी पडत नसल्याचे दिसत आहे. गतवर्षात वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या एकूण ३७०० कारवाया केल्या आहेत. त्यापैकी ४२४ कारवाया अवघ्या थर्टी फर्स्टच्या जल्लोषादरम्यान करण्यात आल्या आहेत. मद्यपींमुळे शहरातील उत्साही वातावरणात विघ्न येऊ नये याकरिता पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांकडून पहाटेपर्यंत गस्त सुरूहोती. यादरम्यान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यरात्रीपर्यंत शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. तर शहर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या २३ अधिकारी व ३३५ कर्मचाºयांमार्फत आवश्यक ठिकाणांसह चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याशिवाय ३६५ ठिकाणी बॅरीगेट्स लावून मद्यपी चालकांकडून भरधाव वेगात वाहने चालवली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जात होती. त्यामध्ये पामबीच मार्गासह शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर वाहनांची झडाझडती घेऊन ४० ब्रीथ अ‍ॅनालायझर्स मशिनद्वारे वाहनचालकाने मद्यपान केले आहे का याची तपासणी करण्यात आली. या वेळी ४२४ चालकांनी मद्यपान केल्याचे आढळले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असल्याचे उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. २०१६मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्रीत ३१५ कारवाया करण्यात झालेल्या असून यंदा त्यात १०९ने भर पडली आहे.बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यातच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत २४६२ कारवाया करण्यात आल्या होत्या. मद्यपान करून वाहन चालवणे, विना हेल्मेट, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट अशा विविध गुन्ह्यांखाली या कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील चालकांमध्ये सुधार नसल्याचे दिसत आहे.सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : मद्यपी चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्यानुसार गतवर्षात सुमारे ३७०० मद्यपी चालकांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही चालकांना शिस्त लागत नसल्याने अवघ्या थर्टी फर्स्टच्या रात्रीत ४२४ मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा अपघातांमध्ये मृतांची संख्या वाढत असल्याने मद्यपान करून वाहन चालवणाºयांविरोधात पोलिसांकडून कारवाया केल्या जातात. परंतु पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील मद्यपी चालकांना वाहतुकीची शिस्त अंगवळणी पडत नसल्याचे दिसत आहे. गतवर्षात वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या एकूण ३७०० कारवाया केल्या आहेत. त्यापैकी ४२४ कारवाया अवघ्या थर्टी फर्स्टच्या जल्लोषादरम्यान करण्यात आल्या आहेत. मद्यपींमुळे शहरातील उत्साही वातावरणात विघ्न येऊ नये याकरिता पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी नाकाबंदी लावून पोलिसांकडून पहाटेपर्यंत गस्त सुरूहोती. यादरम्यान पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार, परिमंडळ उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यरात्रीपर्यंत शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. तर शहर पोलिसांसह वाहतूक शाखेच्या २३ अधिकारी व ३३५ कर्मचाºयांमार्फत आवश्यक ठिकाणांसह चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याशिवाय ३६५ ठिकाणी बॅरीगेट्स लावून मद्यपी चालकांकडून भरधाव वेगात वाहने चालवली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जात होती. त्यामध्ये पामबीच मार्गासह शहरातील इतर महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर वाहनांची झडाझडती घेऊन ४० ब्रीथ अ‍ॅनालायझर्स मशिनद्वारे वाहनचालकाने मद्यपान केले आहे का याची तपासणी करण्यात आली. या वेळी ४२४ चालकांनी मद्यपान केल्याचे आढळले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असल्याचे उपआयुक्त नितीन पवार यांनी सांगितले. २०१६मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्रीत ३१५ कारवाया करण्यात झालेल्या असून यंदा त्यात १०९ने भर पडली आहे.बेशिस्त वाहनचालकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन त्यांना वाहतुकीची शिस्त लागावी या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यातच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत २४६२ कारवाया करण्यात आल्या होत्या. मद्यपान करून वाहन चालवणे, विना हेल्मेट, काळ्या काचा, फॅन्सी नंबरप्लेट अशा विविध गुन्ह्यांखाली या कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून सतत कारवाया होऊनदेखील चालकांमध्ये सुधार नसल्याचे दिसत आहे.मद्यपीकडून पोलिसाला मारहाणथर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाया सुरू होत्या. यादरम्यान सानपाडा येथे राहणारा संजित गोपाल दास हा दुचाकीवर ट्रिपलसिट बसून नेरूळ पोलीस ठाण्यात गेला होता.मद्यपान केल्याने पोलिसांनी पकडलेल्या एका मित्राला सोडवण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला होता. परंतु दास हाच मद्यपान करून ट्रिपलसिट आलेला असल्याने पोलिसांनी त्याचीही चाचणी घेऊन गुन्हा दाखल करण्याला सुरुवात केली.यावेळी त्याने हुज्जत घालून एका हवालदाराला मारहाण केली. या प्रकरणी त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपुत यांनी सांगितले.ंया कारवायांमध्ये सर्वाधिक ८३ कारवाया तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत झाल्या आहेत. तर सर्वाधिक मोठे क्षेत्र असलेल्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीत एकही कारवाई झालेली नाही.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई