शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

थिरीपुरा चिट फंड घोटाळा, ५२ नागरिकांना ५० लाखांना फसविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 4:47 AM

थिरीपुरा चिट फंड कंपनीने नवी मुंबईमध्येही मोठा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. ५२ नागरिकांचे ५० लाख रुपये घेऊन व्यवस्थापन फरार झाले आहे. गुंतवणूकदार हतबल झाले असून, त्यांनी सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - थिरीपुरा चिट फंड कंपनीने नवी मुंबईमध्येही मोठा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. ५२ नागरिकांचे ५० लाख रुपये घेऊन व्यवस्थापन फरार झाले आहे. गुंतवणूकदार हतबल झाले असून, त्यांनी सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे.चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या थिरीपुरा चिट फंड कंपनीने सानपाड्यामधील जी स्क्वेअर बिझनेस पार्कच्या पाचव्या मजल्यावर कार्यालय घेतले होते. जवळपास पाच वर्षांपासून कंपनीने नवी मुंबईमध्ये एजंट नेमून छोट्या व्यावसायिकांकडून पैसे संकलित करण्यास सुरुवात केली होती. गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज व कर्ज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. रोज ८०० रुपये भरल्यास २० महिन्यांनंतर ५ लाख रुपये परतावा देण्यात येणार किंवा दोन महिने सलग पैसे भरल्यास ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल अशाप्रकारे जाहिरातबाजी करून गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यात आले होते. अनेक गुंतवणूकदारांनी कर्ज घेऊन त्याची परतफेडही केली होती. विश्वास ठेवून गुंतवणूकदार पैसे गुंतवत राहिले, परंतु फेब्रुवारी २०१८ मध्ये अचानक कंपनीने कार्यालय बंद केले आहे. कार्यालय बंद करण्यापूर्वी एजंटच्या माध्यमातून सर्वांची खातेपुस्तके जमा करून घेतली होती. यामुळे कंपनीने जाणीवपूर्वक फसवणूक करण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी पद्धतशीरपणे कार्यपद्धती राबविल्याचा संशय गुंतवणूकदारांना आला व त्यांनी एकत्रित येण्यास सुरुवात केली.नवी मुंबईमधील जवळपास ५२ गुंतवणूकदार एकत्र आले आहेत. त्या सर्वांची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सर्वांची रकमेची नोंद असलेली पुस्तके व्यवस्थापनाने जमा करून घेतली आहे. या सर्वांनी निवेदन तयार करून १० जूनला सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे. फसवणूक झालेल्या सर्वांनी कंपनीची माहिती घेतली असता कंपनीच्या तीन मुख्य व्यवस्थापकांविरोधात मे २०१८ मध्ये चेन्नईमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक झाल्याची माहिती मिळाली. या कंपनीने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये शाखा उघडल्या होत्या.नवी मुंबईमधील गुंतवणूकदारही हतबल झाले आहेत. कष्टाने कमविलेले पैसे चिट फंड कंपनीमध्ये गुंतविले होते. गुंतवणूक फुकट गेलीच, शिवाय व्यवसायासाठी दुसरीकडे कर्ज काढण्याची वेळ अनेकांवर आली आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये ५२ गुंतवणूकदारांनी त्यांची किती फसवणूक झाली याचा उल्लेख केला आहे. न्याय मिळावा अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी व्यक्त केली असून, पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्नचिट फंड कंपनीने गुंतवणूकदारांकडून पासबूक जमा करून घेतले आहेत. पुस्तके व संगणकातील नोंदी गायब करून पुरावेच नष्ट करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कार्यालयातील साहित्य सील करावे, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.सानपाड्यामध्ये दुसरी घटनायापूर्वी सानपाड्यामध्ये फ्युजन इंटरनॅशनल कंपनीने पामबीच रोडजवळील टॉवरमध्ये कार्यालय थाटून हॉलिडे पॅकेजच्या नावाने नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. जवळपास चारशे नागरिकांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी लढा दिल्यानंतर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.चिट फंड कंपनीने फसवणूक केल्याची लेखी तक्रार गुंतवणूकदारांनी दिली आहे. संबंधित कंपनीविरोधात चेन्नईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी नवीन गुन्हा दाखल करायचा की त्याच गुन्ह्यामध्ये समावेश करायचा याविषयी पुढील कार्यवाही सुरू आहे.- सूरज पाडवी,वरिष्ठ पोलीस निरीक्षकसानपाडाथिरीपुरा चिट फंड कंपनीमध्ये प्रतिदिन ८०० रुपयांची गुंतवणूक करत होतो. दीड लाख रुपये जमा केले असून, पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली. फेबु्रवारीमध्ये कंपनीने सानपाड्यामधील कार्यालयाला टाळे लावले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे.- राजेंद्र बडोले,गुंतवणूकदार

टॅग्स :newsबातम्याNavi Mumbaiनवी मुंबई