शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संवादापेक्षा वादविवादच जास्त, नवी मुंबईत महायुतीत धुसफुस; उमेदवार अनिश्चिततेमुळेही अस्वस्थता

By नामदेव मोरे | Updated: March 23, 2024 05:30 IST

नवी मुंबईतील बड्या नेत्यांसमोर मनोमिलनाचे आव्हान

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईत महायुतीमधील शिवसेना व भाजपच्या नेत्यांमधील संवाद जवळपास ठप्प झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन व मोडकळीस आलेल्या इमारत पुनर्बांधणीच्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका केली जात आहे. उमेदवाराच्या अनिश्चिततेमुळेही इच्छुकांमध्ये अस्वस्थता असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मनोमिलन करण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्यांसमोर उभे आहे. महायुतीमध्ये उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गट व भाजप दोन्हीमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे.

शिवसेनेला हा मतदारसंघ सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, धुळवडीला मुख्यमंत्री कोणाला उमेदवारीचा रंग लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबईमध्ये बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व शिवसेना नेते-पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद असला तरी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधून विस्तव जात नाही. 

मागील काही महिन्यांत झोपडपट्टी पुनर्वसन, जुन्या इमारतींची पुनर्बांधणी, यादवनगर येथील शाळेचे लोकार्पण या मुद्द्यांवरून नाईक व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद पाहावयास मिळाले आहेत. 

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चाैगुले व इतर पदाधिकाऱ्यांनी नाईक यांच्यावर आक्षेप घेऊन युतीचा धर्म फक्त आम्हीच पाळायचा का, असा प्रश्न उपस्थित केला होता. नाईक यांच्या वतीने महापालिकेचे माजी सभागृह नेते अनंत सुतार यांनी या टीकेला उत्तर दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

नवी मुंबईमधील आमदार गणेश नाईक व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद टोकाला गेले आहेत; पण या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप काहीही भाष्य केलेले नाही. मतभेद अद्याप मिटविले नसले तरी जास्त वाढणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर नवी मुंबईतील  ठप्प झालेला संवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा सुरू करणार, याकडे लक्ष लागले आहे.

८ लाख मतदार

नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ८ लाख १८ हजारपेक्षा जास्त मतदार आहेत. यामुळे निवडणुकीमध्ये येथील मते निर्णायक ठरणार आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाGanesh Naikगणेश नाईक