शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 21:02 IST

प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

मधूकर ठाकूर, उरण : हवामान खात्याने यावर्षी महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे उरणकरांची चिंता वाढली आहे.

उरण तालुक्यात मागील पाच वर्षांपासून पावसाचा खेळ खंडोबा सुरू आहे.प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.त्यामध्ये आता अवकाळी, अवचित कोसळणाऱ्या पावसाची भर पडली आहे. ॠतु,बेॠतुत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.अधुन-मधुन शेतकऱ्यांना वादळं, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे.मानवाने निसर्ग आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे.त्यामुळे निसर्गाचे

ॠतुचक्रच बिघडले आहे.बिघडलेल्या ॠतुचक्राचा   निसर्ग आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे तज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे.मात्र तज्ञांचे सल्ले मानव फारसे मनावर घेताना दिसत नाही.त्याचे परिणाम हळूहळू आता जाणवू लागले असल्याचे पर्यावरणवाद्यांकडून सांगितले जात आहे. 

दरम्यान उरण परिसरात मागील पाच वर्षांपासून कोसळणाऱ्या कमी अधिक पावसामुळे उरणकरांना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तसेच शेतकऱ्यांसाठीही हा चिंतेचा विषय बनला आहे.यासाठी उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी मागील पाच वर्षांतील पावसाची आकडेवारीच दिली आहे. उरण तालुक्यातील मागील पाच वर्षांची आकडेवारीवर्ष               आकडेवारी २०१८.       २२८७.९७ मी.मि.२०१९.        ३४१०.५० मी.मि.२०२०.        २४२७. मी.मि.२०२१.        २९२२. मी.मि.२०२२.         २६३४. मी.मि.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण