शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 21:02 IST

प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

मधूकर ठाकूर, उरण : हवामान खात्याने यावर्षी महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे उरणकरांची चिंता वाढली आहे.

उरण तालुक्यात मागील पाच वर्षांपासून पावसाचा खेळ खंडोबा सुरू आहे.प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.त्यामध्ये आता अवकाळी, अवचित कोसळणाऱ्या पावसाची भर पडली आहे. ॠतु,बेॠतुत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.अधुन-मधुन शेतकऱ्यांना वादळं, चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीचाही सामना करावा लागत आहे.मानवाने निसर्ग आणि पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे.त्यामुळे निसर्गाचे

ॠतुचक्रच बिघडले आहे.बिघडलेल्या ॠतुचक्राचा   निसर्ग आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे तज्ञांकडून वारंवार सांगितले जात आहे.मात्र तज्ञांचे सल्ले मानव फारसे मनावर घेताना दिसत नाही.त्याचे परिणाम हळूहळू आता जाणवू लागले असल्याचे पर्यावरणवाद्यांकडून सांगितले जात आहे. 

दरम्यान उरण परिसरात मागील पाच वर्षांपासून कोसळणाऱ्या कमी अधिक पावसामुळे उरणकरांना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तसेच शेतकऱ्यांसाठीही हा चिंतेचा विषय बनला आहे.यासाठी उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी मागील पाच वर्षांतील पावसाची आकडेवारीच दिली आहे. उरण तालुक्यातील मागील पाच वर्षांची आकडेवारीवर्ष               आकडेवारी २०१८.       २२८७.९७ मी.मि.२०१९.        ३४१०.५० मी.मि.२०२०.        २४२७. मी.मि.२०२१.        २९२२. मी.मि.२०२२.         २६३४. मी.मि.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण