शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा अहवाल सादर करा, ३ जानेवारी २०१८पर्यंतची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:23 AM

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे.

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणावर पुणे येथील हरित लवादात शुक्रवारी सुनावणी पार पडली. या वेळी न्यायालयाने यासंदर्भात राष्ट्रीय प्रदूषण महामंडळ व राज्य प्रदूषण महामंडळाला याठिकाणी होणा-या प्रदूषणाची माहिती घेऊन ३ जानेवारी २०१८पर्यंत प्रतिज्ञापत्र करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील जल, वायुप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणा-या केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक महामंडळ, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य वन मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आदींना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. न्यायमूर्ती यू.पी. साळवी व डॉ. नागीण नंदा यांच्या बेंचसमोर आज या प्रकरणी युक्तिवाद केल्यानंतर यासंदर्भात न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण महामंडळ व राज्य प्रदूषण महामंडळाला या यासंदर्भात एकत्रित पाहणी करून कोणकोणत्या कंपन्या जल, वायू प्रदूषण करीत आहेत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र हरित लवादाकडे ३ जानेवारी २०१८ रोजी सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचे वकील डॉ. सुधाकर आव्हाड या प्रकरणी बाजू लवादासमोर मांडत आहेत. नजीकच्या काळात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीत अचानक भेट देऊन येथील बंद असलेल्या सीईटीपी प्लांटमुळे या केंद्राशी निगडित संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला होता.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादाकडे गेल्यानंतर याठिकाणचे सात कारखाने बंद पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने घेतला होता. ३ जानेवारीपर्यंत लवादाने प्रदूषण करणाºया कंपन्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांवर संक्र ांत येण्याची शक्यता आहे. या ठिकाणच्या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे. याठिकाणचे जीवनमान धोक्यात आले असून, प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर लवकरच पनवेलचे दिल्ली होण्यास वेळ लागणार नसल्याचे याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे यांनी सांगितले.तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच अशा प्रकारची याचिका हरित लवादाकडे दाखल करण्यात आल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.या ठिकाणच्या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई