शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत सोशल डिस्टन्सच्या नियमाला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:47 IST

सोशल डिस्टन्सचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. मागील चार दिवसांत कोरोनाचे १00 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेसह पोलीस यंत्रणांची झोप उडाली आहे; परंतु याचे कोणतेही सोयरसूतक नवी मुंबईकरांना नसल्याचे दिसून आले आहे. कारण लॉकडाउन असतानाही नागरिकांची अनेक भागात गर्दी होताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले जात आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.नवी मुंबई शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसांत तब्बल १२२ रुग्णांत वाढ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या शहरवासीयांसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे; परंतु काही लोकांना याचे अद्यापि गांभीर्य समजले नसल्याचे दिसून आले आहे. कारण लॉकडाउनचे आदेश झुगारून सर्रासपणे लोकांचा वावर सुरू आहे. खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. विनाकारण रस्त्यांवर हुंदडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली सोशल डिस्टन्सच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया शेकडो नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईचे हे सत्र सुरूच आहे; परंतु शहरवासीयांच्या बिनधास्त वागण्यात कोणताही फरक पडल्याचे दिसत नाही. नागरिकांबरोबरच भाजी व फळ विक्रीचा व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांनीसुद्धा हैदोस घातला आहे.वाशी सेक्टर १५ येथील बी-३ टाइप इमारत क्रमांक १ ते १२ समोरील रस्त्यांवर लॉकडाउनमध्येही फेरीवाल्यांची गर्दी दिसून येते. या ठिकाणी सकाळी खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून येथील फेरीवाल्यांना वारंवार सूचना केल्या जात आहेत; परंतु या सूचनांकडे कानाडोळा करीत फेरीवाल्यांनी व्यवहार सुरूच ठेवले. याच परिसरात असलेल्या मांस व मटण विक्रेत्यांकडूनही सोशल डिस्टन्सच्या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.>रहिवासी असोसिएशनची तक्रारवाशी सेक्टर १५ येथील बी-३ टाइप इमारतीच्या समोरील रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर बी-३ टाइप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या वतीने पोलीस, महापालिका प्रशासनाला गुरुवारी एक निवेदन दिल्याची माहिती आयुब खान यांनी ‘लोकमत’ला दिली. कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे संबंधित यंत्रणांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांसमोरे मोठे आवाहनकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचारी प्राणाची बाजी लावून रुग्णांची सेवा करीत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहवे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. त्यानंतरसुद्धा काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.एरव्ही मॉर्निंग वॉकच्या नावाने तिटकारा असलेली मंडळीसुद्धा सकाळच्या वेळी फिरायला घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईच्या प्रत्येक भागात कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र पाहवयास मिळत आहे.ऐरोली, घणसोली, कोपरखणे, वाशी परिसरात तर ठिकठिकाणी लोकांचे जथ्थे दिसून येत आहेत. शहरातील अशा बेशिस्त नागरिकांना आवर घालण्याचे आवाहन आता पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.