शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

स्मार्ट सिटीतले सायबर सेल दुर्लक्षितच, तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:32 IST

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. परंतु गुन्हे शाखेला तज्ज्ञ अधिकारी मिळत नसल्याने उपलब्ध अधिका-यांनाच प्रशिक्षण देऊन सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न पोलीस आयुक्तांना करावा लागत आहे.मागील काही वर्षात इंटरनेटच्या वाढत्या बेजबाबदार वापरामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणा-यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ईमेलवर अथवा मॅसेजवर आलेली एखादी फसव्या आमिषाच्या लिंकवर सहज विश्वास ठेवला जात आहे. यामुळे स्वत:ची खासगी तसेच बँकेची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचत आहे. तर बँकांकडून ग्राहकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची कसलीही माहिती फोनवर विचारली जात नसतानाही अनोळखी व्यक्तीला ती सांगितली जाते. यावरून नागरिकांमध्ये अद्यापही सायबर गुन्हेगारीविषयी अज्ञानता असल्याचे दिसून येत आहे. परिणामी छोटासा निष्काळजीपणा आॅनलाइन फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे. अशा प्रकारातून नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षी आॅनलाइन फसवणुकीच्या ७५ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये डेबिट अथवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याच्या १५, सोशल मीडियातून बदनामी तसेच फसवणुकीच्या २३, नोकरीच्या आमिषाने लुबाडल्याच्या ८ व इतर प्रकारच्या २१ तक्रारी आहेत. त्यापैकी अवघ्या २७ गुन्ह्यांची उकल होवू शकलेली आहे.बहुतांश गुन्ह्यांमध्ये नागरिकांना फसवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड परराज्यातील अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले जाते. तर ठरावीक कालावधीनंतर ते बंद केले जात असल्याने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहचता येत नाही. तर नेटद्वारे केल्या जाणाºया गुन्ह्यात सराईत हॅकर्सचा सहभाग असल्याने बनावट आयपीच्या आधारे जगभरातून कुठूनही ते गुन्हेगारी कृत्य करतात. अशा प्रकारे जेएनपीटीचे एक बंदर, वाशीतले रुग्णालय तसेच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ यावर देखील हॅकर्सने हल्ला केलेला आहे. त्यांच्यापर्यंतही पोहचणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराची भविष्याची वाटचाल पाहता अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासह त्यांचा उलगडा करणारी यंत्रणा पोलिसांकडे असण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षात शहरातील आयटी पार्कमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर रहिवासी लोकसंख्येत वाढ होवू लागल्याने शहराचाही विस्तार वाढत आहे. यामुळे पुढील पाच ते दहा वर्षात लूट, दरोडे यापेक्षा घरबसल्या आॅनलाइन लुटीचे अथवा फसवणुकीचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तज्ज्ञ अधिकाºयांची कमतरता असल्याने भविष्यात सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण होवू शकते. याकडे आजवरच्या आयुक्तांकडून फारसे लक्ष देण्यात आलेले नसल्याचेही दिसून येत आहे. मात्र विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी सायबर गुन्ह्यांची गतवर्षातली आकडेवारी लक्षात घेवून सध्याच्या परिस्थितीत सुधार घडवण्यावर भर दिला आहे. त्याकरिता गुन्हे शाखेकडे उपलब्ध अधिकाºयांना विशेष प्रशिक्षण देवून सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई