शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

स्मार्ट सिटीतले सायबर सेल दुर्लक्षितच, तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:32 IST

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. परंतु गुन्हे शाखेला तज्ज्ञ अधिकारी मिळत नसल्याने उपलब्ध अधिका-यांनाच प्रशिक्षण देऊन सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न पोलीस आयुक्तांना करावा लागत आहे.मागील काही वर्षात इंटरनेटच्या वाढत्या बेजबाबदार वापरामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणा-यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ईमेलवर अथवा मॅसेजवर आलेली एखादी फसव्या आमिषाच्या लिंकवर सहज विश्वास ठेवला जात आहे. यामुळे स्वत:ची खासगी तसेच बँकेची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचत आहे. तर बँकांकडून ग्राहकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची कसलीही माहिती फोनवर विचारली जात नसतानाही अनोळखी व्यक्तीला ती सांगितली जाते. यावरून नागरिकांमध्ये अद्यापही सायबर गुन्हेगारीविषयी अज्ञानता असल्याचे दिसून येत आहे. परिणामी छोटासा निष्काळजीपणा आॅनलाइन फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे. अशा प्रकारातून नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षी आॅनलाइन फसवणुकीच्या ७५ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये डेबिट अथवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याच्या १५, सोशल मीडियातून बदनामी तसेच फसवणुकीच्या २३, नोकरीच्या आमिषाने लुबाडल्याच्या ८ व इतर प्रकारच्या २१ तक्रारी आहेत. त्यापैकी अवघ्या २७ गुन्ह्यांची उकल होवू शकलेली आहे.बहुतांश गुन्ह्यांमध्ये नागरिकांना फसवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड परराज्यातील अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले जाते. तर ठरावीक कालावधीनंतर ते बंद केले जात असल्याने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहचता येत नाही. तर नेटद्वारे केल्या जाणाºया गुन्ह्यात सराईत हॅकर्सचा सहभाग असल्याने बनावट आयपीच्या आधारे जगभरातून कुठूनही ते गुन्हेगारी कृत्य करतात. अशा प्रकारे जेएनपीटीचे एक बंदर, वाशीतले रुग्णालय तसेच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ यावर देखील हॅकर्सने हल्ला केलेला आहे. त्यांच्यापर्यंतही पोहचणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराची भविष्याची वाटचाल पाहता अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासह त्यांचा उलगडा करणारी यंत्रणा पोलिसांकडे असण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षात शहरातील आयटी पार्कमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर रहिवासी लोकसंख्येत वाढ होवू लागल्याने शहराचाही विस्तार वाढत आहे. यामुळे पुढील पाच ते दहा वर्षात लूट, दरोडे यापेक्षा घरबसल्या आॅनलाइन लुटीचे अथवा फसवणुकीचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तज्ज्ञ अधिकाºयांची कमतरता असल्याने भविष्यात सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण होवू शकते. याकडे आजवरच्या आयुक्तांकडून फारसे लक्ष देण्यात आलेले नसल्याचेही दिसून येत आहे. मात्र विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी सायबर गुन्ह्यांची गतवर्षातली आकडेवारी लक्षात घेवून सध्याच्या परिस्थितीत सुधार घडवण्यावर भर दिला आहे. त्याकरिता गुन्हे शाखेकडे उपलब्ध अधिकाºयांना विशेष प्रशिक्षण देवून सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई