शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

स्मार्ट सिटीतले सायबर सेल दुर्लक्षितच, तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:32 IST

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. परंतु गुन्हे शाखेला तज्ज्ञ अधिकारी मिळत नसल्याने उपलब्ध अधिका-यांनाच प्रशिक्षण देऊन सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न पोलीस आयुक्तांना करावा लागत आहे.मागील काही वर्षात इंटरनेटच्या वाढत्या बेजबाबदार वापरामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणा-यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ईमेलवर अथवा मॅसेजवर आलेली एखादी फसव्या आमिषाच्या लिंकवर सहज विश्वास ठेवला जात आहे. यामुळे स्वत:ची खासगी तसेच बँकेची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचत आहे. तर बँकांकडून ग्राहकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची कसलीही माहिती फोनवर विचारली जात नसतानाही अनोळखी व्यक्तीला ती सांगितली जाते. यावरून नागरिकांमध्ये अद्यापही सायबर गुन्हेगारीविषयी अज्ञानता असल्याचे दिसून येत आहे. परिणामी छोटासा निष्काळजीपणा आॅनलाइन फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे. अशा प्रकारातून नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षी आॅनलाइन फसवणुकीच्या ७५ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये डेबिट अथवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याच्या १५, सोशल मीडियातून बदनामी तसेच फसवणुकीच्या २३, नोकरीच्या आमिषाने लुबाडल्याच्या ८ व इतर प्रकारच्या २१ तक्रारी आहेत. त्यापैकी अवघ्या २७ गुन्ह्यांची उकल होवू शकलेली आहे.बहुतांश गुन्ह्यांमध्ये नागरिकांना फसवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड परराज्यातील अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले जाते. तर ठरावीक कालावधीनंतर ते बंद केले जात असल्याने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहचता येत नाही. तर नेटद्वारे केल्या जाणाºया गुन्ह्यात सराईत हॅकर्सचा सहभाग असल्याने बनावट आयपीच्या आधारे जगभरातून कुठूनही ते गुन्हेगारी कृत्य करतात. अशा प्रकारे जेएनपीटीचे एक बंदर, वाशीतले रुग्णालय तसेच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ यावर देखील हॅकर्सने हल्ला केलेला आहे. त्यांच्यापर्यंतही पोहचणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराची भविष्याची वाटचाल पाहता अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासह त्यांचा उलगडा करणारी यंत्रणा पोलिसांकडे असण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षात शहरातील आयटी पार्कमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर रहिवासी लोकसंख्येत वाढ होवू लागल्याने शहराचाही विस्तार वाढत आहे. यामुळे पुढील पाच ते दहा वर्षात लूट, दरोडे यापेक्षा घरबसल्या आॅनलाइन लुटीचे अथवा फसवणुकीचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तज्ज्ञ अधिकाºयांची कमतरता असल्याने भविष्यात सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण होवू शकते. याकडे आजवरच्या आयुक्तांकडून फारसे लक्ष देण्यात आलेले नसल्याचेही दिसून येत आहे. मात्र विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी सायबर गुन्ह्यांची गतवर्षातली आकडेवारी लक्षात घेवून सध्याच्या परिस्थितीत सुधार घडवण्यावर भर दिला आहे. त्याकरिता गुन्हे शाखेकडे उपलब्ध अधिकाºयांना विशेष प्रशिक्षण देवून सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई