शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतले सायबर सेल दुर्लक्षितच, तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:32 IST

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. परंतु गुन्हे शाखेला तज्ज्ञ अधिकारी मिळत नसल्याने उपलब्ध अधिका-यांनाच प्रशिक्षण देऊन सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न पोलीस आयुक्तांना करावा लागत आहे.मागील काही वर्षात इंटरनेटच्या वाढत्या बेजबाबदार वापरामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकणा-यांचे प्रमाण वाढू लागले आहे. ईमेलवर अथवा मॅसेजवर आलेली एखादी फसव्या आमिषाच्या लिंकवर सहज विश्वास ठेवला जात आहे. यामुळे स्वत:ची खासगी तसेच बँकेची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचत आहे. तर बँकांकडून ग्राहकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डची कसलीही माहिती फोनवर विचारली जात नसतानाही अनोळखी व्यक्तीला ती सांगितली जाते. यावरून नागरिकांमध्ये अद्यापही सायबर गुन्हेगारीविषयी अज्ञानता असल्याचे दिसून येत आहे. परिणामी छोटासा निष्काळजीपणा आॅनलाइन फसवणुकीला कारणीभूत ठरत आहे. अशा प्रकारातून नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षी आॅनलाइन फसवणुकीच्या ७५ तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये डेबिट अथवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढल्याच्या १५, सोशल मीडियातून बदनामी तसेच फसवणुकीच्या २३, नोकरीच्या आमिषाने लुबाडल्याच्या ८ व इतर प्रकारच्या २१ तक्रारी आहेत. त्यापैकी अवघ्या २७ गुन्ह्यांची उकल होवू शकलेली आहे.बहुतांश गुन्ह्यांमध्ये नागरिकांना फसवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड परराज्यातील अथवा बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले जाते. तर ठरावीक कालावधीनंतर ते बंद केले जात असल्याने पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहचता येत नाही. तर नेटद्वारे केल्या जाणाºया गुन्ह्यात सराईत हॅकर्सचा सहभाग असल्याने बनावट आयपीच्या आधारे जगभरातून कुठूनही ते गुन्हेगारी कृत्य करतात. अशा प्रकारे जेएनपीटीचे एक बंदर, वाशीतले रुग्णालय तसेच नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ यावर देखील हॅकर्सने हल्ला केलेला आहे. त्यांच्यापर्यंतही पोहचणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. शहराची भविष्याची वाटचाल पाहता अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासह त्यांचा उलगडा करणारी यंत्रणा पोलिसांकडे असण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षात शहरातील आयटी पार्कमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर रहिवासी लोकसंख्येत वाढ होवू लागल्याने शहराचाही विस्तार वाढत आहे. यामुळे पुढील पाच ते दहा वर्षात लूट, दरोडे यापेक्षा घरबसल्या आॅनलाइन लुटीचे अथवा फसवणुकीचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तज्ज्ञ अधिकाºयांची कमतरता असल्याने भविष्यात सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान निर्माण होवू शकते. याकडे आजवरच्या आयुक्तांकडून फारसे लक्ष देण्यात आलेले नसल्याचेही दिसून येत आहे. मात्र विद्यमान आयुक्त संजय कुमार यांनी सायबर गुन्ह्यांची गतवर्षातली आकडेवारी लक्षात घेवून सध्याच्या परिस्थितीत सुधार घडवण्यावर भर दिला आहे. त्याकरिता गुन्हे शाखेकडे उपलब्ध अधिकाºयांना विशेष प्रशिक्षण देवून सायबर सेलच्या बळकटीकरणाचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबई