शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

MIDC मधील रस्ता रूंदीकरणादरम्यान वाचविलेल्या वृक्षांची कत्तल

By नामदेव मोरे | Published: March 10, 2024 2:52 PM

नेरूळ एलपी जवळील प्रकार : चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

नामदेव मोरे

नवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये नेरूळ एलपी येथे रस्ता रूंदीकरण करताना वाचविलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.पदपथाला लागून असलेले वृक्ष तोडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.            

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. करावे येथे पाणथळ तलावाचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. दुसरीकडे एमआयडीसीमध्येही बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. नेरूळ एलपी पुलाच्या समोर महानगरपालिकेने पदपथाला लागून वृक्षलागवड केली होती. अनेक वृक्ष २० ते २५ फुट उंच वाढले होते. महामार्गाला लागून असलेल्या जोड रस्त्याच्या रूंदीकरणाच्या दरम्यानही या वृक्षांचे अस्तीत्व कायम राहील याकडे लक्ष दिले होते. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी रूंदीकरणादरम्यान येथील वृक्षतुटणार नाहीत याकडे लक्ष दिले होते. परंतु काही दिवसांपुर्वी अचानक येथील वृक्ष तोडण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरू होत असलेल्या नवीन कंपनीच्या बांधकामाचा दर्शनी भाग दिसावा यासाठी वृक्षतोड केली जात असल्याची शंका स्थानीक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.          

या वृक्षतोडीविषयी माजी परिवहन समिती सभापती चंद्रकांत आगोंडे यांनीही आक्षेप घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त, एमआयडीसी प्रशासनाकडे याविषयी लेखी तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे. पदपथाला लागून असलेले वृक्ष कोणत्याही स्थितीमध्ये तोडण्यात येवू नये अशी भुमीका त्यांनी घेतली आहे. वृक्ष तोड करण्यासाठी परवानगी दिलीच कशी. वृक्ष तोड करण्यापुर्वी स्थानीक नागरिकांकडून सुचना व हरकती मागविणे आवश्यक होते. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांवर सुचना लावणे आवश्यक होते. परंतु अशा प्रकारच्या सुचना कधीच लावण्यात आल्या नव्हत्या. परवानगी न घेता वृक्ष तोड केली असेल तर तत्काळ गुन्हे दाखल करावे. परवानगी दिली असेल तर त्याचीही चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भुखंडामधील वृक्ष तोडण्यासाठी परवानगी दिली आहे. बाहेरील वृक्षतोडीसाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महानगरपालिकेनेही दखल घ्यावीनेरूळ एलपी येथे केलेली वृक्षतोड एमआयडीसीच्या क्षेत्रामधील असली तरी वृक्षलागवड महानगरपालिकेने केली होती. यामुळे महानगरपालिका आयुक्तांनीही याविषयी दखल घ्यावी व संबंधीतांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

महानगरपालिकेने रस्ता रूंदीकरण करताना वृक्षतोड होणार नाही याची काळजी घेतली होती. ते वृक्ष अचानक तोडण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासास कोण जबाबदार आहे याची चौकशी करावी व संबंधीतांवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने कारवाई केली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.चंद्रकांत आगोंडे, माजी परिवहन समिती सभापती,नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईforestजंगल