शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

By नारायण जाधव | Updated: May 24, 2023 14:37 IST

निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.   

नवी मुंबई - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महाराष्ट्र सागरी महामंडळाला (एमएमबी) आक्सा बीचवर समुद्री भिंत बांधकामाच्या संदर्भातली सीआरझेड परवानगी कागदपत्रे प्रस्तुत करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील  नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार आणि मुंबई स्थित पर्यावरण कार्यकर्ता झोरु बाथेना यांनी दाखल केलेल्या अर्जावर पुणे येथील लवादाच्या पश्चिम पीठाने निवेदनकर्त्यांच्या आक्षेपांची दखल घेतली आहे. निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.   

निवेदकांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांनी हे नमुद केले की महाराष्ट्र किनारपट्टी नियामक प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) मिनिट्समध्ये सीआरझेड१ क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर स्पष्टपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. बीचवर विविध प्रकारच्या “सीफ्रंट विकास व सुशोभिकरणा”च्या संदर्भामध्ये एमएमबीच्या निवेदनांवर एमसीझेडएमएने हा प्रतिसाद दिला आहे.    

हरित लवादाचे निवेदक म्हणाले की, त्यांनी अथक प्रयत्न करुन देखील आणि आरटीआय निवेदने सादर करुन देखील राज्य पर्यावरण विभागाकडून कोणतेही सीआरझेड मंजूरी दस्तऐवज त्यांना मिळू शकले  नाहीत. नॅटकनेक्टने केलेल्या एका तक्रारीवरुन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाने (एमओइएफसीसी) राज्य पर्यावरण विभागाला प्रकरणात लक्ष घालण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील याबद्दल कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.

एमएमबीने अखेरीस शासनाला हे सूचित केले की समुद्री भिंतीच्या अनुसरणाची तपासणी करण्यासाठी संस्थेने आंतर्गत समिती स्थापन केली आहे. परंतु या समितीच्या अहवालांना देखील तक्रारकर्त्यांना अद्याप देण्यात आलेले नाही. जस्टीस दिनेश कुमार सिंग यांचा न्यायिक सदस्य आणि डॉ. विजय कुलकर्णी यांचा तज्ज्ञ सदस्य म्हणून समावेश असलेल्या पीठाने शुक्रवारी एमएमबीचे वकील साकेत मोने यांना सीआरझेड मंजूरीच्या संदर्भातील कागदपत्रांना त्याचप्रमाणे बांधकाम सुरु करण्याआधी महामंडळाने घेतलेल्या पर्यावरण प्रभाव अभ्यासाला प्रस्तुत करण्याचा निर्देश दिला आहे. याआधी मोने यांनी त्यांच्या अशिलांकडे आवश्यक त्या सर्व मंजू-यांची कागदपत्रे असल्याचे सांगितले होते. पुढील सुनावणी ३ जुलैला ठरवण्यात आली आहे.

भट्टाचार्य यांच्या मते समुद्री भिंत प्रकल्प पर्यावरण विरोधी आहे, कारण तो पर्यावरणात्मक दृष्ट्या संवेदनशील आक्सा येथे उभारण्यात आला असून, त्यामुळे बीच दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. एमएमबीने खणणीसाठी जेसीबीसारखी अवजड यंत्रे कार्यरत केली असून बीचवर सामुग्रीचा प्रचंड ढीग झालेला आढळतो. त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली की सहा सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष पीठाचे अध्यक्ष जस्टिस आदर्श कुमार गोयल यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधल्या बीचेसवर समुद्री भिंतींसाठी निर्बंध लागू केले होते.

विशेष पीठाच्या गेल्या वर्षाच्या एप्रिलमधल्या निर्णयाप्रमाणे एनआयओटीने (नॅशनल इनस्टिट्यूट ऑफओशन टेक्नॉलॉजी) सूचवल्याप्रमाणे बीचचे पोषण आणि रीफ्ससोबत हायब्रीड समाधानाचा कार्यान्वय केला गेला पाहिजे. जस्टिस गोयल यांच्या विशेष पीठाने देखील सविस्तर किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचा राज्यांना आदेश दिला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई