शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

By नारायण जाधव | Updated: May 24, 2023 14:37 IST

निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.   

नवी मुंबई - राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) महाराष्ट्र सागरी महामंडळाला (एमएमबी) आक्सा बीचवर समुद्री भिंत बांधकामाच्या संदर्भातली सीआरझेड परवानगी कागदपत्रे प्रस्तुत करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील  नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार आणि मुंबई स्थित पर्यावरण कार्यकर्ता झोरु बाथेना यांनी दाखल केलेल्या अर्जावर पुणे येथील लवादाच्या पश्चिम पीठाने निवेदनकर्त्यांच्या आक्षेपांची दखल घेतली आहे. निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.   

निवेदकांच्या वकील रोनिता भट्टाचार्य यांनी हे नमुद केले की महाराष्ट्र किनारपट्टी नियामक प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) मिनिट्समध्ये सीआरझेड१ क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर स्पष्टपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. बीचवर विविध प्रकारच्या “सीफ्रंट विकास व सुशोभिकरणा”च्या संदर्भामध्ये एमएमबीच्या निवेदनांवर एमसीझेडएमएने हा प्रतिसाद दिला आहे.    

हरित लवादाचे निवेदक म्हणाले की, त्यांनी अथक प्रयत्न करुन देखील आणि आरटीआय निवेदने सादर करुन देखील राज्य पर्यावरण विभागाकडून कोणतेही सीआरझेड मंजूरी दस्तऐवज त्यांना मिळू शकले  नाहीत. नॅटकनेक्टने केलेल्या एका तक्रारीवरुन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाने (एमओइएफसीसी) राज्य पर्यावरण विभागाला प्रकरणात लक्ष घालण्याचे व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील याबद्दल कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.

एमएमबीने अखेरीस शासनाला हे सूचित केले की समुद्री भिंतीच्या अनुसरणाची तपासणी करण्यासाठी संस्थेने आंतर्गत समिती स्थापन केली आहे. परंतु या समितीच्या अहवालांना देखील तक्रारकर्त्यांना अद्याप देण्यात आलेले नाही. जस्टीस दिनेश कुमार सिंग यांचा न्यायिक सदस्य आणि डॉ. विजय कुलकर्णी यांचा तज्ज्ञ सदस्य म्हणून समावेश असलेल्या पीठाने शुक्रवारी एमएमबीचे वकील साकेत मोने यांना सीआरझेड मंजूरीच्या संदर्भातील कागदपत्रांना त्याचप्रमाणे बांधकाम सुरु करण्याआधी महामंडळाने घेतलेल्या पर्यावरण प्रभाव अभ्यासाला प्रस्तुत करण्याचा निर्देश दिला आहे. याआधी मोने यांनी त्यांच्या अशिलांकडे आवश्यक त्या सर्व मंजू-यांची कागदपत्रे असल्याचे सांगितले होते. पुढील सुनावणी ३ जुलैला ठरवण्यात आली आहे.

भट्टाचार्य यांच्या मते समुद्री भिंत प्रकल्प पर्यावरण विरोधी आहे, कारण तो पर्यावरणात्मक दृष्ट्या संवेदनशील आक्सा येथे उभारण्यात आला असून, त्यामुळे बीच दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. एमएमबीने खणणीसाठी जेसीबीसारखी अवजड यंत्रे कार्यरत केली असून बीचवर सामुग्रीचा प्रचंड ढीग झालेला आढळतो. त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली की सहा सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष पीठाचे अध्यक्ष जस्टिस आदर्श कुमार गोयल यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधल्या बीचेसवर समुद्री भिंतींसाठी निर्बंध लागू केले होते.

विशेष पीठाच्या गेल्या वर्षाच्या एप्रिलमधल्या निर्णयाप्रमाणे एनआयओटीने (नॅशनल इनस्टिट्यूट ऑफओशन टेक्नॉलॉजी) सूचवल्याप्रमाणे बीचचे पोषण आणि रीफ्ससोबत हायब्रीड समाधानाचा कार्यान्वय केला गेला पाहिजे. जस्टिस गोयल यांच्या विशेष पीठाने देखील सविस्तर किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचा राज्यांना आदेश दिला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई