शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

युतीमुळे नवी मुंबईत शिवसेना खिळखिळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:38 IST

कार्यकर्त्यांचेही खच्चीकरण; उरणमधील एकमेव आमदारही गमावला; भाजपची मजबूत पकड

- नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये युतीचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे. चारपैकी तीन जागा भाजपला देण्यात आल्या. उरणमधील एकमेव जागा शिवसेनेला देण्यात आली; परंतु तेथेही भाजपमधील बंडखोर उमेदवार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेना खिळखिळी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून पुढील वर्षी नवी मुंबईत होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्येही त्याचा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट आहे.

नवी मुंबई हा १९९० ते २००४ पर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सलग तीन वेळा बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. १९९५ मध्ये महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही पहिला महापौर शिवसेनेचाच झाला. पनवेलमध्येही शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी होती. उरणमध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर निवडून आले होते. या परिसरामध्ये पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वही नव्हते.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये २००५ च्या निवडणुकीमध्ये भाजपचा एक नगरसेवक आला होता. २०१० च्या निवडणुकीमध्येही एकच नगरसेविका निवडून आली. देशातील सर्वात महत्त्वाचा परिसर असलेल्या नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी परिश्रम करण्यास सुरुवात केली.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये पनवेलमध्ये काँगे्रसचे प्रशांत ठाकूर व बेलापूरमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या मंदा म्हात्रे यांना पक्षात प्रवेश देऊन दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेतले. पनवेल महानगरपालिका व उरण नगरपालिकाही ताब्यात घेतली. नवी मुंबईमध्ये एक आमदार असला तरी महापालिकेमध्ये सत्ता नसल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक व त्यांच्या ४८ नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन नवी मुंबई महापालिकाही ताब्यात घेतली.

युतीच्या जागावाटपामध्ये नवी मुंबईमधील एक जागा शिवसेनेला मिळालीच पाहिजे होती; परंतु पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी फारसा आग्रह धरला नाही व जिंकून येणारे ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडले. दोन्ही मतदारसंघ सोडल्यामुळे महापालिका क्षेत्रातील शिवसेना खिळखिळी होईल, असे येथील पदाधिकाऱ्यांनी सांगूनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, नवी मुंबईवर भाजपचे पूर्ण वर्चस्व निर्माण झाले आहे.

नवी मुंबईमध्ये शिवसेनेने बंडखोर उमेदवार उभा केला नाही. बेलापूरमधील बंडखोर उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. पनवेलमधूनही शिवसेनेच्या बबन पाटील यांनाही माघार घेण्यास भाग पाडले; परंतु उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नाही. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी सोबत असल्यामुळेच बालदी यांनी विजय मिळवून सेनेला धक्का दिला. युतीमुळे शिवसेनेला लाभ झाला नसून भविष्यातही फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता

नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाºयांमध्ये युती जाहीर झाल्यानंतर अस्वस्थता निर्माण झाली आहे. पदाधिकाºयांनी रोडवर उतरून आंदोलन केले. एकतरी मतदार संघ मिळावा, अशी मागणी केली होती. नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघातून १९९०, १९९५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर गणेश नाईक यांनी विजय मिळविला होता. १९९९ मध्ये सीताराम भोईर विजयी झाले होते. महापालिकेवरही सत्ता मिळविली होती. २०१४ च्या निवडणुकीमध्येही शिवसेना उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. २०१५ च्या निवडणुकीमध्ये विजय मिळण्याची खात्री असताना युतीमुळे उमेदवारीपासूनच वंचित राहवे लागले.

महापालिकेमध्येही बसणार फटका

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०१५ मध्ये होत आहे. शहरात भाजपचे दोन आमदार असून जवळपास ६४ नगरसेवक झाले आहेत. काँगे्रसचे चार नगरसेवकही भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे येणाºया महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व इतर पक्षांचे नगरसेवक शिवसेनेत येण्यास उत्सुक होते; परंतु ते आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

अंतर्गत गटबाजीचा फटका

नवी मुंबईमधील शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका संघटनेला बसला आहे. नवी मुंबईमधील एकतरी मतदारसंघ मिळावा. नाही मिळाला तर बंडखोर उमेदवार उभा करावा, अशी शिवसैनिकांची इच्छा होती; परंतु बंडखोर उमेदवार उभा करण्यास शिवसेनेतीलच काही नेत्यांनी विरोध केला. परिणामी, भाजपचा व इतरांचा प्रचार करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरला नाही. शिवसेनेचे सर्वात मोठे नुकसान अंतर्गत गटबाजीमुळेच झाले असल्याची प्रतिक्रिया पक्षाचेच काही पदाधिकारी व्यक्त करत असतात.

भाजप नेत्यांनी करून दाखवले

नवी मुंबई, पनवेल व उरण हा देशातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या परिसरामध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ‘नैना’च्या माध्यमातून येथे नवीन शहरे वसविली जात आहेत. या परिसरातील राजकारणावर यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शेतकरी कामगार पक्ष व काँगे्रसची पकड होती. २०१४ पर्यंत या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वच नव्हते.

मागील पाच वर्षांत भाजपने या परिसरावर लक्ष केंद्रित करून संपूर्ण परिसर भाजपमय करून टाकला. महामंडळावर पदाधिकारी नेमतानाही नवी मुंबईला झुकते माप दिले. कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषदेवर घेतले. गणेश नाईक यांच्यासह प्रशांत ठाकूर यांनाही भाजपमध्ये घेऊन पक्ष बळकट केला; परंतु दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी मात्र कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. विधानसभेसाठी नवी मुंबईमधील एक मतदारसंघही मिळविता आला नाही, यामुळे शिवसेना पदाधिकारीच नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा