पनवेल शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल
By Admin | Updated: June 23, 2016 03:36 IST2016-06-23T03:36:14+5:302016-06-23T03:36:14+5:30
मंगळवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

पनवेल शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल
पनवेल : मंगळवारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच पावसात पनवेल तालुक्यातील बत्ती गुल झाली होती. अद्याप पावसाला नीटशी सुरुवात देखील झाली नाही तर वीज गायब होऊ लागली आहे. ऐन पावसाळ्यात वीजपुरवठा कसा सुरळीत राहणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून पाठवण्यात आलेल्या विजेच्या बिलाचा आकडा दिवसेंदिवस फुगत असून नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. त्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यात महावितरण प्रशासनाला मात्र अपयश आल्याचे वाढत्या पॉवर कट्समुळे दिसून येत आहेत. वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या विजेच्या तारांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात दुर्लक्ष केल्याने नागरिकांना अशा वेळी अवेळी पॉवर कट्च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल शहरात देखील विजेचा लपंडाव सुरूच आहे. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता गायब झालेली वीज पहाटे ३ वाजता आली, त्यामुळे नागरिक हैराण झाले.
ग्रामीण परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरु आहे. बहुतेकदा दिवसाची सुरु वात ही विजेविना होत असताना आता रात्री-अपरात्री विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिकांची झोप खराब होत आहे. कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, कधी विजेच्या तारा तुटणे अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरणला संपर्क साधत तक्र ार दिली असता लाइनमन पाठवतो, आमच्याकडे माणसं कमी आहेत, अशी उत्तरे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दुपारच्या वेळी वीज जात असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत असून तक्र ार केल्यानंतर तासाभराच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत होतो मात्र त्यानंतरही विजेचा लपंडाव सुरु राहतो. प्रत्यक्षात वीजवाहिन्यांची देखभाल दुरु स्ती करणे आवश्यक असताना महावितरणकडून या कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)