शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बेशिस्त रिक्षाचालकांनी अडवली वाट, नवी मुंबई शहरातील रस्ते बनले थांबे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:52 AM

Navi Mumbai News : बहुतांश ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. शहरातील प्रत्येक नोडमधील महत्त्वाच्या मार्गांवर सकाळ, संख्याकाळ हे चित्र पाहायला मिळत आहे.

- सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबई : बेपत्ता शहरातील रिक्षांची वाढती संख्या व लॉकडाऊननंतर भाडे मिळवण्यासाठी त्यांच्यातली चढाओढ, यामुळे जागोजागी अनधिकृत थांबे तयार झाले आहेत. काही ठिकाणी अधिकृत थांबे असतानाही त्याला लागूनच रस्त्यांवरही रिक्षांच्या रांगा लागत आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. शहरातील प्रत्येक नोडमधील महत्त्वाच्या मार्गांवर सकाळ, संख्याकाळ हे चित्र पाहायला मिळत आहे. या संदर्भात अनेकांनी आरटीओ, तसेच वाहतूक पोलिसांकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत.  

ऐरोली रेल्वे स्थानक  : या रेल्वे स्थानकाच्या दुतर्फा रिक्षा चालकांनी मोकळ्या जागेत थांबा तयार केला आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या, तसेच वाहनांच्या रहदारीला अडथळा होईल, अशा बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या केलेल्या असतात.  

रेल्वे स्थानकातून बाहेर पाऊल टाकताच रिक्षाच्या गर्दीतून वाट काढावी लागते. अनेकदा त्यांच्या मुजोरी स्वभावाला नागरिकांना सामोरे जावे लागते.      - राहुल देशमुख, रहिवाशी  

बेशिस्त चालकांवर कारवाईसाठी फ्लाइंग स्कॉड कार्यरत करण्यात आले आहे. त्याद्वारे आठवड्याभरात चाळीस रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, तर अवैध थांबे, प्रवाशीऐवजी मालवाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे.     - हेमांगी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई 

घणसोली रेल्वे स्थानक : स्थानकाच्या पश्चिमेला रिक्षा थांब्यावर एकाच संघटनेच्या रिक्षा उभ्या आहेत. इतर रिक्षाचालकांनी रस्त्यावर दोन ठिकाणी अवैध थांबे तयार केले आहेत. भाडे मिळविण्याच्या प्रयत्नात रहदारीला अडथळा होईल, अशा रिक्षा उभ्या आहेत. 

 एखाद्या प्रवाशाबरोबर वाद झाल्यास घरापर्यंत पाठलाग करून रिक्षावाले त्रास देतात.  - संपत घोलप, रहिवासी

नेरुळ एलपी पूल : डी.वाय. पाटील स्टेडियमलगत अधिकृत रिक्षा थांबा असताना, तेथे अवैधरीत्या बस उभ्या राहत असल्यानेदुसऱ्या लेनमध्ये रिक्षाच्या रांगा लागत आहेत. यामुळे रहदारीलाही अडथळा निर्माण होऊनसर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे.  

 थांब्यावर मर्यादेपेक्षा जास्त रिक्षा उभ्या होत असल्याने वाहतूककोंडी होत आहे.  - सुहास मिंडे, रहिवाशी 

सानपाडा रेल्वे स्थानक : एपीएमसी मार्केटला जोडणारे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने येथे नागरिकांची वर्दळ असते. स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला रस्त्यावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे सातत्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत असते.

अनेकदा रिक्षाचालकांच्यात आपापसात वाद होतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. -उमेश पवार, रहिवाशी 

एम.जी. कॉम्प्लेक्स : अगोदरच अरुंद असलेल्या वाशी कोपरखैरणे मार्गावर जागोजागी रिक्षा थांबे तयार झाले आहेत. त्यात वाशीतील एम.जी. कॉम्प्लेक्स येथे रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत.  

जुहूगाव परिसरात जागा मिळेल तिथे रिक्क्षा उभ्या केल्याने कोंडी होते.  - विजय ताम्हाणे, रहिवाशी 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी