शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

स्कूलव्हॅन चालकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी; गिरीश गुणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:20 IST

विद्यार्थीवाहक संस्था आणि आरटीओच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कार्यक्रम

कळंबोली : पनवेल विद्यार्थीवाहक संस्थेतील ४५० स्कूलव्हॅन चालकांच्या माध्यमातून १६ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यांच्या सानिध्यात विद्यार्थी किमान एक - दीड तास असतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी व्हॅनचालकांवर असल्याचे मत डॉक्टर गिरीश गुणे यांनी व्यक्त केले. रविवारी विद्यार्थीवाहक संस्था आणि पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२० निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेलमधील गोखले सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, हरेश बेतावडे, अ‍ॅड. शुभांगी झेमसे, ज्योती देशमाने, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, लक्ष्मी आय क्लिनिकचे सचिन भूमकर, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका रुचिता लोंढे, सचिन पोलादे, अनिल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला रक्तदान, आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्कूलव्हॅनच्या परिवहन आणि वाहतूक विभागाकडून विविध चाचण्या केल्या जातात. त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओकडून दिले जाते. मात्र, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहकांची मानसिकता कधी तपासली जाते का? असा प्रश्न गुणे यांनी उपस्थित केला. स्कूलव्हॅन चालकांच्या मानसिकतेवर उद्याचे चांगले नागरिक घडू शकतात. त्यामुळे आगामी काळामध्ये विद्यार्थीवाहक संस्थेकडून याकरिता विशेष व्याख्यान आयोजित करण्याचा सल्ला या वेळी डॉ. गिरीश गुणे यांनी दिला.

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी, विद्यार्थीवाहकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल रिक्षा विद्यार्थीवाहक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी केले.विद्यार्थीवाहक संस्था आणि पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात उपक्रमांना मार्गदर्शन करताना मान्यवर.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र