शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 06:54 IST

प्रकल्पग्रस्तांची फसवणूकीचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

पालघर : रिलायन्स गॅस पाईपलाइन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्ताना सर्वोच्च मोबदला व प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे तसेच वर्सोवा पूल संदर्भात प्रशासकीय स्तरावर त्वरित धोरणात्मक निर्णय घेण्या बाबत गुरु वारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. या प्रकरणी मनसेने शड्डू ठोकल्याने आगामी काळात खळखट्याक आंदोलनाची सुरुवात होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कंपनीने संबंधित प्रकल्पग्रस्तांना रु पये ५९ हजार ८४० प्रती गुंठा देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. परंतु हा दर देण्यास रिलायन्स कंपनीने असमर्थता दाखिवल्याचे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले. तेंव्हा संखे यांनी संताप व्यक्त करीत ५९ हजार ८४० प्रती गुंठा दर ही आर्थिक फसवणूक झालेल्या प्रकल्पग्रसतांना मान्य नसल्याचे सांगून, जर ही रिलायन्स कंपनी मनमानी पध्दतीने काम करणार असेल तर मनसे या कंपनीच्या अधिकाºयांच्या विरोधात उभी ठाकेल असे सांगितले. तसेच बाधित प्रकल्पग्रसतांना सर्वोच्च मोबदला देण्या संदर्भात शासनाची भूमिका कचखाऊ असल्याचा टोला संखे यांनी लगावला.सर्वसामान्य जनतेला, वाहनधारकांना होणारा त्रास, वेळेचा होणारा अपव्यय आणि आर्थिक बाजू वाचेल अशी सर्व समावेशक भूमिका मनसेने घेत पालघर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. या बाबतीत प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून येत्या आठवड्यात शासन निर्णय अपेक्षित असल्याचे डॉ. नारनवरे यांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर नजीक असलेल्या वर्सोवा पुलाला तडे गेल्याचे कित्येक वर्षापूर्वी निदर्शनास येऊनही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ डागडुजी करून वाहतूक सुरू ठेवण्याची मलमपट्टी शासन करीत असल्याची टीका जिल्हाध्यक्षानी केली. तसेच पुला संदर्भात कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रशासनाचा डाव कोणाच्या आर्थिक फायद्यापोटी खेळला जातोय का? अशी शंका संखे यांनी यावेळी व्यक्त केली.वर्सोवा पुलाचे काम २५ डिसेंबरपर्यत पूर्णच्वर्सोवा पुला बाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विलंब होत असल्याचे मान्य करून, येत्या पंधरा दिवसात याबाबतीत सुरू असलेले काम २५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.च्यावेळी शिष्टमंडळात मनकासेचे जिल्हा सचिव अनंत दळवी, तलासरी अध्यक्ष सुनील ईभाड, पालघर अध्यक्ष मंगेश घरत, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर, शहर अध्यक्षा गीता संखे उपस्थित होते.

टॅग्स :Relianceरिलायन्सMumbaiमुंबईMNSमनसे