शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:08 PM

एपीएमसीमध्ये १२७३ वाहनांमधून आवक : १६,४४८ टन कृषिमाल विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई : व्यापाऱ्यांसह माथाडी कामगारांनी संप मागे घेताच, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत झाले आहेत. गुरुवारी १२७३ वाहनांमधून १६,४४८ टन कृषिमाल विक्रीसाठी आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

राज्य शासनाने विधेयक मागे घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी कामगारांसह व्यापाऱ्यांनीही संप मागे घेतल्याची घोषणा केली. मध्यरात्रीपासून भाजी व फळ मार्केट सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत भाजी मार्केटमध्ये राज्याच्या विविध भागांमधून ५१३ ट्रक व टेम्पोमधून आवक झाली होती. रविवारी मार्केट बंद, सोमवारी कमी झालेली आवक व पुढील दोन दिवस असलेल्या बंदमुळे किरकोळ मार्केटही ओस पडली होती. एपीएमसीमध्ये पहाटेच किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवसभरात १८९० टन कांदा, ८८० टन बटाटा व ९६ टन लसूनही विक्रीसाठी आल्याची नोंद आहे.

बंदमुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्केटमध्ये विक्री न झालेली फळे फेकून द्यावी लागली होती. मार्केट सुरू झाल्यानंतरही पहिल्या दिवशी फक्त १४५ टन मालच विक्रीसाठी आला होता. धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहारही सुरळीत सुरू झाले असून, शुक्रवारी व शनिवारी आवक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई