शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 14:22 IST

पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले.

ठळक मुद्दे पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

मयूर तांबडे 

पनवेल - पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी (9 जुलै) सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पोलिसांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

मुसळधार पावसामुळे पनवेलमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. माथेरानच्या डोंगररांगांमध्येही मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीमधील पाण्याची पातळी वाढली आहे. उमरोली गावचा पनवेलशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  येथील निर्मीती गार्डनमध्ये राहणारे आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व त्याची पत्नी सारिका आंब्रे मोटारसायकलवरून  नदीवरील छोटय़ा पुलावरून पनवेलकडे जात होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते मोटारसायकलसह नदीमधून वाहून गेले. नागरिकांनी याविषयी पोलीस व महसूल प्रशासनाला माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12 वाजेपर्येत त्यांचा तपास न लागल्यामुळे खोपोलीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) ला पाचारण करण्यात आले. 

नदीमध्ये वाहून गेलेला आदित्य आंब्रे हा मुळचा रायगड जिल्ह्यातील महाडमधील दहिवड गावातील रहिवासी आहे. नेरूळमध्ये क्रोमा शोरूममध्ये नोकरी करत आहे. डिसेंबर 2018 मध्ये त्याचा सारिकासोबत विवाह झाला होता. सारिकाचे आई-वडील  नेरूळमध्ये राहत आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक घटनास्थळी पोहचले आहेत. 

रखडलेल्या कामामुळे दुर्घटना

उमरोलीमध्ये नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु ठेकेदाराने पावसाळ्यापुर्वी पुलाचे काम पुर्ण केले नाही. यामुळे जुन्या छोट्या पुलावरून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला की छोटा पूल पाण्याखाली जात असून गावचा पनवेलशी संपर्क तुटतो. जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. 

गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा सोमवारी संपर्क तुटला होता. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. उमरोली गावाला जोडणाऱ्या स्वातंत्रपूर्व काळापासून असलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा पूल यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तयार होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. परिणामी पूल अद्याप अर्धवट स्थितीतच आहे. 

दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने तिथल्या सुमारे 500 कुटुंबांचा संपर्क तुटला. तर नवीन पूल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला पाया देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. तर गावात प्रवेशाचा मार्गच बंद झाल्याने उमरोली गावातील चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. अनेकजण सकाळीच कामानिमित्ताने गावाबाहेर आले असता, ते परत घरी पोहचू शकलेले नाहीत. यामुळे पावसाळ्या पूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही तसे न झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा संताप उमरोली गावातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊसriverनदी