शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

गाढी नदीमध्ये मोटारसायकलसह दांपत्य गेले वाहून, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 14:22 IST

पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले.

ठळक मुद्दे पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

मयूर तांबडे 

पनवेल - पनवेलमधील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी (9 जुलै) सकाळी उमरोली पुलावरून मोटारसायकलसह दांपत्य वाहून गेले. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पोलिसांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

मुसळधार पावसामुळे पनवेलमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. माथेरानच्या डोंगररांगांमध्येही मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीमधील पाण्याची पातळी वाढली आहे. उमरोली गावचा पनवेलशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  येथील निर्मीती गार्डनमध्ये राहणारे आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व त्याची पत्नी सारिका आंब्रे मोटारसायकलवरून  नदीवरील छोटय़ा पुलावरून पनवेलकडे जात होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ते मोटारसायकलसह नदीमधून वाहून गेले. नागरिकांनी याविषयी पोलीस व महसूल प्रशासनाला माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. दुपारी 12 वाजेपर्येत त्यांचा तपास न लागल्यामुळे खोपोलीवरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) ला पाचारण करण्यात आले. 

नदीमध्ये वाहून गेलेला आदित्य आंब्रे हा मुळचा रायगड जिल्ह्यातील महाडमधील दहिवड गावातील रहिवासी आहे. नेरूळमध्ये क्रोमा शोरूममध्ये नोकरी करत आहे. डिसेंबर 2018 मध्ये त्याचा सारिकासोबत विवाह झाला होता. सारिकाचे आई-वडील  नेरूळमध्ये राहत आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक घटनास्थळी पोहचले आहेत. 

रखडलेल्या कामामुळे दुर्घटना

उमरोलीमध्ये नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु ठेकेदाराने पावसाळ्यापुर्वी पुलाचे काम पुर्ण केले नाही. यामुळे जुन्या छोट्या पुलावरून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला की छोटा पूल पाण्याखाली जात असून गावचा पनवेलशी संपर्क तुटतो. जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. 

गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा सोमवारी संपर्क तुटला होता. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. उमरोली गावाला जोडणाऱ्या स्वातंत्रपूर्व काळापासून असलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा पूल यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तयार होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. परिणामी पूल अद्याप अर्धवट स्थितीतच आहे. 

दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने तिथल्या सुमारे 500 कुटुंबांचा संपर्क तुटला. तर नवीन पूल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला पाया देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. तर गावात प्रवेशाचा मार्गच बंद झाल्याने उमरोली गावातील चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. अनेकजण सकाळीच कामानिमित्ताने गावाबाहेर आले असता, ते परत घरी पोहचू शकलेले नाहीत. यामुळे पावसाळ्या पूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही तसे न झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा संताप उमरोली गावातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊसriverनदी