शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

हद्दीबाहेरील प्रवासासाठी पोलिसांवर ई-पासच्या अर्जांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 01:29 IST

नवी मुंबईतील स्थिती : अंत्यावश्यक किंवा अंत्यसंस्काराची सांगितली जाते सबब, ठोस कारण नसलेल्यांचे अर्ज नामंजूर

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : मागील दहा दिवसात नवी मुंबईपोलिसांनी ई-पाससाठीचे १ हजार ५३३ अर्ज निकाली काढून त्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. अर्जासोबत प्रवासाच्या ठोस कारणांची आवश्यक कागदपत्रे जोडल्यास दोन तासात अर्ज निकाली काढला जात आहे. मात्र अनेक जण ठोस कारण नसतानाही अर्ज करत असल्याने व काहींकडून अपुरी कागदपत्रे जोडली जात आहे. असे २० हजार ८८२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

कोरोनामुळे राज्यात कठोर निर्देश लागू असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. त्यानंतरच संबंधितांना प्रवासाची मुभा दिली जात आहे. त्यानुसार २३ एप्रिलपासून ते ३ मे च्या पहाटेपर्यंत नवी मुंबई पोलिसांनी १ हजार ५३३ ई-पासचे वाटप केले आहे. त्यापैकी ८६५ ई-पासची मुदतदेखील संपली आहे. 

या दहा दिवसांच्या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीबाहेर प्रवासाची अनुमती मागणारे २३ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ ७० अर्ज सध्या प्रक्रियेत आहेत. उर्वरित २० हजार ८८२ अर्ज विविध कारणांनी फेटाळण्यात आले आहेत. ई-पाससाठी अत्यावश्यक सेवा, जवळच्या अथवा कुटुंबातील व्यक्तीचे निधन, वैद्यकीय किंवा लग्न ही कारणे ग्राह्य धरली जात आहेत. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास अर्ज मंजूर केला जात आहे. मात्र शासनाने सवलत दिलेल्या या कारणांशिवाय इतर कारणांनी प्रवासासाठी ई-पास मागणाऱ्यांचे अर्ज फेटाळले जात आहेत.

किती तासांत मिळतो ई-पासअत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पोलिसांकडून ई-पाससाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यांच्याकडे ऑनलाइन अर्ज प्राप्त होताच प्रवासाचे कारण व जोडलेली कागदपत्रे तपासून किमान दोन ते कमाल १२ तासात ई-पास दिला जात आहे. मात्र अर्ज अपुरा किंवा कागदपत्रे नसल्यास पडताळणी होईपर्यंत प्रलंबित राहू शकतो.

ई-पाससाठी असा करावा अर्जई-पासकरिता अर्ज करण्यासाठी पोलिसांच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. त्यावर अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे, त्याची कागदपत्रे जोडायची आहेत. सर्व माहितीची खात्री करून ई-पास दिला जातो.

तीच ती कारणेप्रवासाचे अत्यावश्यक कारण नसतानाही अनेक जण ई-पाससाठी अर्ज करत आहेत. त्यांच्याकडून परिचयाच्या व्यक्तीच्या निधनासह वैद्यकीय कारणांचा आधार घेतला जात आहे. हे पास घेऊन अनेक जण नवी मुंबईबाहेर केवळ विश्रांतीसाठी जाऊ पाहत असल्याचेही दिसून येत आहे.

ही कागदपत्रे हवीत

शासनाने सवलत दिलेल्या कारणांसाठीच पोलिसांकडून ई-पास दिला जात आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्ज योग्यरीत्या भरायचा आहे. तर अर्ज भरताना प्रवासाचे जे कारण नमूद केलेले असेल, त्याची कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.

अत्यावश्यक सुविधा पुरवत असल्यास त्याचा कागदोपत्री पुरावा. नातेवाइकाची किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याचा वैद्यकीय दाखला. अथवा इतर वैद्यकीय कारणासाठी जात असल्यास त्याचाही आवश्यक पुरावा सादर करायचा आहे.

कोविड चाचणीच्या रिपोर्टला विलंब लागत असल्याने ई-पासमधून वगळण्यात आला आहे. परंतु अचानक ठरलेल्या प्रवास वगळता इतर कारणांनी प्रवासादरम्यान तो सोबत ठेवल्यास चौकशी दरम्यान गैरसोय होणार नाही.

 

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई