शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नवी मुंबईतील सर्व्हिस सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याबाबत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 1:44 AM

अधिकारी सुस्त : जलवाहिन्यांमधून चोरले जाते आहे पाणी 

n  सूर्यकांत वाघमारेn  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात गॅरेज व सर्व्हिस सेंटर चालवले जात आहेत. त्या ठिकाणी वापरले जाणारे पाणी येते कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे. बहुतांश सेंटरमध्ये जलवाहिनीच्या चोरीच्या पाण्याचा वापर होत असल्याने सर्वच ठिकाणांची पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात प्रत्येक नोडमध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे सर्व्हिस सेंटर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहने धुण्याचे काम होत आहे. यासाठी शंभर ते दीडशे रुपये शुल्क आकारले जात आहे. यानुसार एका वाहनामागे शेकडो लीटर पाण्याचा वापर होत असल्याने प्रत्येक सेंटरमध्ये दिवसाला लाखो लीटर पाण्याचा वापर होत आहे. त्यांना हे पाणी येतेय कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात चालत असलेले बहुतांश सर्व्हिस सेंटर मोरबेच्या जलवाहिन्यांच्या जळपासच्या परिसरात आहेत. त्यापैकी अनेकांकडून जलवाहिनीचे पाणी चोरले जात असल्याचा दाट संशय आहे. तर नोडमध्ये चालणारे सेंटर चालकांनी जवळपासच्या जलवाहिनीला पाइप जोडून सेंटरपर्यंत पाणी वाहून नेल्याचीही शक्यता आहे. अनेक सेंटरच्या समोर रस्ते खोदून हे नळ जोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी टाक्या उभारून त्यात टँकरद्वारे पाणी साठवले जात असल्याचेही भासवले जात आहे. मात्र उघडपणे हे सर्व्हिस सेंटर चालवले जात असतानाही प्रशासनाकडून तिथली झाडाझडती का घेतली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. 

धोरणात्मक निर्णय घेण्याची गरजवाहने धुतल्यानंतरचे सांडपाणी हे जवळपासच्या नाल्यात व गटारात सोडले जात आहे. वाहने धुण्यासाठी डिझेलचा वापर होत असल्याने सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात तेलाचे प्रमाण असते. नाल्याद्वारे हेच सांडपाणी नाल्यांमधून खाडीत मिसळत आहे. यामुळेच अनेक ठिकाणी पाण्यावर तेलाचे तवंग दिसून मासे मरत असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस सेंटरच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.