शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या पक्षांतरामुळे जागावाटपाचा प्रश्न; राजकीय समीकरणे बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 23:57 IST

शिवसेनेमध्येही अस्वस्थता; दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास तीव्र विरोध

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक समर्थकांसह बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जागावाटपावरून युतीमध्येही तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेलापूर मतदारसंघामध्ये उमेदवारीचा गुंता वाढणार आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला असून शहरात नाईक विरुद्ध अन्य असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईचे राजकारण अडीच दशकांपासून गणेश नाईकांच्या भोवती फिरत आले आहे. श्रमिक सेना ही कामगार संघटना, शिवसेनेचे नेते व मंत्री, शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिवशक्ती राजकीय संघटनेची स्थापना व नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून दहा वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले.

नवी मुंबई म्हणजे नाईक असे समीकरण झालेले असताना सहा वर्षांपासून त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. २०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संजीव नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला व नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांचे अनेक ज्येष्ठ सहकारी सोडून शिवसेना व भाजपत गेले. महापालिका निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही. काँगे्रसच्या मदतीने सत्ता टिकवावी लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेला तब्बल ८४ हजार मतांची आघाडी मिळाल्यानंतर नाईकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलैअखेर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. बेलापूर मतदारसंघातील उमेदवारी हाच प्रवेशामधील प्रमुख अडथळा समजला जात होता.

बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. उमेदवारीसाठी त्याच प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही या मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे नाईकांचा पक्षप्रवेश होण्याविषयी शंका उपस्थित होत होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ११ सप्टेंबरला वाशीमध्ये शक्तिप्रदर्शन करून भाजपत प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. जवळपास ५५ नगरसेवकांसह गणेश नाईक व संजीव नाईक भाजपत जाणार असल्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणातील समीकरणेच बदलणार आहेत.शिवसेना झाली आक्रमकगणेश नाईक यांचा भाजप प्रवेश पक्का झाल्यापासून शिवसेना आक्रमक झाली आहे. महापालिकेमध्ये शिवसेनेचे ३८ नगरसेवक आहेत. ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकदही चांगली आहे. यामुळे नवी मुंबईमधील दोन्ही जागा नाईक परिवाराला सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दोन्ही मतदार संघ दिल्यास विधानसभेला विरोधात काम करण्याचा इशारा दिला आहे. १६ सप्टेंबरला शिवसेना नेते आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त नवी मुंबईत येत असून त्यावेळीही बेलापूर मतदार संघासाठी शिवसेना पदाधिकारी हट्ट धरणार आहेत.मंदा म्हात्रे यांची उमेदवारी टिकणार का?बेलापूर मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला व पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये भाजपला यश मिळवून दिले. पाच वर्षांमध्ये नवी मुंबईमधील मोडकळीस आलेल्या इमारती, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, एपीएमसीमधील विविध घटकांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करून मंदा म्हात्रे या नेहमीच चर्चेत राहिल्या. राज्यातील भाजपच्या एकमेव आगरी समाजाच्या महिला आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यामुळे त्यांची बेलापूर मतदारसंघामधील उमेदवारी पक्की समजली जाते. पण गणेश नाईकांच्या प्रवेशानंतर उमेदवारी टिकणार की नाही याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.नगरसेवकांचा दबावगट म्हणून वापरराष्ट्रवादी काँग्रेसचे ५० व ५ अपक्ष नगरसेवक घेऊन गणेश नाईक भाजपत प्रवेश करत आहेत. ९ सप्टेंबरला नगरसेवक कोकण आयुक्तांकडे वेगळा गट करण्याचे निवेदन देणार होते. पण कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे कारण देऊन बुधवारी सकाळी वेगळा गट करण्याचे निश्चित झाले आहे. बेलापूर मतदारसंघातील उमेदवारीसाठी नगरसेवकांचा दबावगट म्हणून वापर केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. पक्षप्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघावरून शिवसेना व भाजपमध्येही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.युतीमध्ये उमेदवारीवरून तणावलोकसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातून शिवसेना उमेदवाराला ३९ हजार मतांची आघाडी व ऐरोलीमधून ४४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे युतीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एक जागा शिवसेना व एक भाजपला मिळणार हे निश्चित झाले होते. परंतु संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे ऐरोली मतदारसंघ भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले. यानंतर गणेश नाईकांच्या प्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांना उमदेवारी दिली जाण्याची चर्चा झाल्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाManda Mhatreमंदा म्हात्रे