शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘लॉकडाऊन’मधल्या जवळिकीने वाढला ‘दुरावा’, अनलॉक होताच पोलिसांकडे २०८ तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:15 IST

Family News : आवश्यकतेपेक्षा जास्त लाभलेला हा सहवास काही दाम्पत्यांच्या संसारात काडी टाकणारा ठरला आहे. या कालावधीत पती किंवा पत्नीवर संशय  निर्माण करणाऱ्या  घटना अनेकांच्या घरात घडल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई -  लॉकडाऊनमध्ये पती- पत्नीमधील वाढलेला सहवास वेगवेगळ्या वादाला कारणीभूत ठरला आहे. या कालावधीत घडणाऱ्या गोष्टी एकमेकांविरोधात संशय निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे अनलॉक होताच, पती-पतीमधील कलहातून पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.कोरोनामुळे राज्यासह देशभरात लॉकडाऊन  लागू असताना, तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक जण घरात बंदिस्त होता. यादरम्यान अनेक दाम्पत्यांना प्रथमच एकमेकांना एवढा वेळ देता आला, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त लाभलेला हा सहवास काही दाम्पत्यांच्या संसारात काडी टाकणारा ठरला आहे. या कालावधीत पती किंवा पत्नीवर संशय  निर्माण करणाऱ्या  घटना अनेकांच्या घरात घडल्या आहेत. त्यात स्मार्टफोनही  तितकाच कारणीभत ठरल्याचे  काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. अमूक एक गोष्ट आजवर माझ्यापासून का लपवली?  यापासून ते एकमेकांचे  मित्र-मैत्रिणी खटकण्यापर्यंतच्या  कारणांचा त्यात समावेश आहे. विविध कारणांनी कित्येक दाम्पत्यांचा लॉकडाऊनचा कालावधी आपापसात भांडणातच गेला आहे.परिणामी, काही केल्या आपसात पटत नसल्याने अनलॉक होताच, अशा पती-पत्नींनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे, तसेच महिला सहायता कक्षाकडे धाव घेतली आहे. लॉकडाऊन संपताच नवी मबई पोलिसांच्या महिला सहायता कक्षाकडे कौटुंबिक कलहाच्या २०८ तक्रारी प्राप्त झालया आहेत. त्यापैकी ८८ तक्रारी गत कालावधीत निकाली काढण्यात आल्या असून, त्यामधील १५ दाम्पत्यांनी पुन्हा जमवून घेतले आहे, तर ९ प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित १२० तक्रारींवर अद्याप सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Familyपरिवारrelationshipरिलेशनशिप