शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

नवी मुंबई विमानतळाला प्रक्रियायुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 09:07 IST

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे.

- कमलाकर कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. या विभागात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २१.८२ एमएलडी पाणी लागणार असल्याचा अंदाज पर्यावरणविषयक अहवालात व्यक्त केला आहे. यातील १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असणार असल्याने त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले आहेत.

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी डिसेंबर २०२४ ची डेडलाइन आहे, तर तिसरा टप्पा २०२८ मध्ये आणि चौथा टप्पा २०३२ मध्ये पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एनएमआयए) एन्व्हायर्नमेंट  इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला आहे. त्यानुसार विमानतळाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर २१.८२ एमएलडी पाण्याची गरज भासणार असून, यापैकी १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित  ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असेल, असे नमूद केले आहे.  पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सिडकोवर साेपविली आहे, तर प्रक्रिया केलेले ११.२१ एमएलडी पाणी स्वच्छतागृहे, उद्याने, साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले असले तरी, ते कागदावरच आहेत. नैना तसेच प्रस्तावित विविध गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची गरज वाढणार असून २०५० पर्यंतच्या लोकसंख्येचा ढोबळ अंदाज बांधून नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 

    सिडकोने पाण्यासाठी २०५० पर्यंतचे नियोजन केले आहे. त्या वेळच्या लोकसंख्येनुसार या संपूर्ण क्षेत्रासाठी १२७५ एमएलडी पाण्याची गरज लागेल, असा ढोबळ अंदाज आहे.      पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत म्हणून सिडको बाळगंगा धरणाकडे पाहत असून, त्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. असे असले तरी, पुढील पाच- सहा वर्षांत ते पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. ते पूर्ण केल्यास ३५० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज आहे.      सिडकोने अलीकडेच राज्य सरकारकडून कोंढाणे धरण हस्तांतरित करून घेतले असून, त्यातून नैना क्षेत्राची पाण्याची गरज भागणार आहे.     २०२८ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार असला तरी, सध्या केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याने पाणीपुरवठ्याची डोकेदुखी सिडकोस सताविणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई