शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नवी मुंबई विमानतळाला प्रक्रियायुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 09:07 IST

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे.

- कमलाकर कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. या विभागात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २१.८२ एमएलडी पाणी लागणार असल्याचा अंदाज पर्यावरणविषयक अहवालात व्यक्त केला आहे. यातील १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असणार असल्याने त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले आहेत.

चार टप्प्यांत हे विमानतळ पूर्ण केले जाणार असून,  सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी डिसेंबर २०२४ ची डेडलाइन आहे, तर तिसरा टप्पा २०२८ मध्ये आणि चौथा टप्पा २०३२ मध्ये पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (एनएमआयए) एन्व्हायर्नमेंट  इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला आहे. त्यानुसार विमानतळाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर २१.८२ एमएलडी पाण्याची गरज भासणार असून, यापैकी १०.६१ एमएलडी पिण्यायोग्य, तर उर्वरित  ११.२१ एमएलडी पुनर्प्रक्रिया केलेले असेल, असे नमूद केले आहे.  पिण्यायोग्य पाण्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सिडकोवर साेपविली आहे, तर प्रक्रिया केलेले ११.२१ एमएलडी पाणी स्वच्छतागृहे, उद्याने, साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तीन एसटीपी प्लॅन्ट प्रस्तावित केले असले तरी, ते कागदावरच आहेत. नैना तसेच प्रस्तावित विविध गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची गरज वाढणार असून २०५० पर्यंतच्या लोकसंख्येचा ढोबळ अंदाज बांधून नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 

    सिडकोने पाण्यासाठी २०५० पर्यंतचे नियोजन केले आहे. त्या वेळच्या लोकसंख्येनुसार या संपूर्ण क्षेत्रासाठी १२७५ एमएलडी पाण्याची गरज लागेल, असा ढोबळ अंदाज आहे.      पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत म्हणून सिडको बाळगंगा धरणाकडे पाहत असून, त्याचे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. असे असले तरी, पुढील पाच- सहा वर्षांत ते पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. ते पूर्ण केल्यास ३५० एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज आहे.      सिडकोने अलीकडेच राज्य सरकारकडून कोंढाणे धरण हस्तांतरित करून घेतले असून, त्यातून नैना क्षेत्राची पाण्याची गरज भागणार आहे.     २०२८ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार असला तरी, सध्या केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याने पाणीपुरवठ्याची डोकेदुखी सिडकोस सताविणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई