शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:28 IST

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.

नवी मुंबई : २०१४ सालापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकावर १०० पैकी २४ रुपये कर्ज होते. मात्र, मागील दहा वर्षांत हेच कर्ज ८४ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच १० वर्षांत प्रत्येक नागरिकावर तब्बल ६० रुपयांचे कर्ज वाढले असून, २०२६ साली देश कर्जात बुडालेला असेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. तुम्हाला कर्जात बुडायचे नसेल, तर भाजपच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी नेरूळमध्ये बुधवारी झालेल्या सत्ता परिवर्तन महासभेत उपस्थितांना केले.

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. भाजपने देशातील व्यवस्था बिघडवली असून, मागील १० वर्षांत सुमारे ३० ते ३५ हजार छापे टाकले आहेत; परंतु यामधील किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

देशातील प्रत्येक राज्यात छापे पडत असताना गुजरातमध्ये एकही छापा पडलेला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील अनेक उद्योग, कारखाने गुजरातला गेले असून, पुन्हा पाच वर्षे भाजपला दिल्यास सर्वच कारखाने गुजरातेत जातील, असे ते म्हणाले. मोदी हे देशापेक्षा गुजरातचेच पंतप्रधान अधिक असल्याची टीका यावेळी आंबेडकर यांनी केली. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, दिलीप बंदीचोडे, शिल्पा रणदिवे, डी.डी. गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाlok sabhaलोकसभा