शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 03:57 IST

माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे.

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे. सलग तीन आठवडे स्थायी समितीची सभा झालेली नाही. मे नंतर परिवहन समितीची बैठकही होऊ शकली नसून, नोव्हेंबरपर्यंत परिवहनचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निवडणुका जवळ आल्या की, महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याची स्पर्धा सुरू होते. नवी मुंबईमध्येही यापूर्वी सर्वच निवडणुकांच्या वेळी हे चित्र पाहावयास मिळत होते; परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक माजी महापौरांसह माजी नगरसेवकांची फौज घेऊन प्रत्यक्ष भाजपात गेले आहेत. गणेश नाईक व महापालिकेमधील नगरसेवकही लवकरच पक्षांतर करण्याची चर्चा सुरू आहे.या सर्व प्रक्रियेचा परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. नाईक समर्थकांची २९ जुलैला महापौर बंगल्यावर मिटिंग झाल्यानंतर पक्षांतराच्या हालचालींना वेग आला, तेव्हापासून स्थायी समितीची एकही सभा झालेली नाही. या कालावधीमध्ये तीन सभा होणे अपेक्षित होते. गणेशोत्सवानंतर विधानसभेसाठीची आचारसंहिता लागणार असून, स्थायी समितीच्या सभा न झाल्यास अनेक प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. किंवा शेवटच्या काही आठवड्यांमध्ये चर्चा न होताच कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांवर पुरेशी चर्चा न होताच त्यांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. मे महिन्यामध्ये सभा झाली होती. या नंतर परिवहनमधील सहा जण निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडताना विरोधी पक्षांना डावलण्यात आले. फक्त राष्ट्रवादी काँगे्रसच्याच सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडीला शिवसेनेने शासनाकडे आव्हान दिले. शासनाने नियमबाह्य निवडीला स्थगिती दिली आहे. यामुळे परिवहन समितीची सभा झालेली नाही. आॅगस्टमध्ये सभा झाली नाही तर विधानसभेची निवडणूक होईपर्यंत कामकाज ठप्प राहणार आहे. नोव्हेंबरनंतरच कामकाज होऊ शकणार आहे, यामुळे परिवहनशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.केंद्र शासनाने नवी मुंबईसाठी १०० इलेक्ट्रिकल बसेस मंजूर केल्या आहेत. या बसेस महापालिकेच्या ताफ्यात आल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी या विषयी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता स्थायी समितीसाठी विषय नसल्यामुळे मिटिंग झाली नसल्याचे सांगण्यात आले. सर्वसाधारण सभा २० आॅगस्टला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण स्थायी समितीची सभा नक्की कधी होणार या विषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही. स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.परिवहन समितीची शेवटची सभा मे महिन्यामध्ये झाली आहे. त्यानंतर एकही सभा होऊ शकली नाही. आॅगस्टमध्ये बैठक झाली नाही तर नोव्हेंबरपर्यंत सभा घेता येणार नाही. सभा आयोजित करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे; परंतु प्रशासनाने अद्याप काहीही कार्यवाही केलेली नाही.- सुधीर पवार, परिवहन समिती सदस्य, काँगे्रसविकासकामे पूर्ण करण्याचे आव्हाननवी मुंबई महानगरपालिकेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आर्थिक वर्षातील दोन महिने कामकाज होऊ शकले नाही. पक्षांतराच्या गोंधळामुळे एक महिना फुकट गेला असून, पुढील दोन महिने विधानसभा निवडणुकीमुळे कामकाज होऊ शकणार नाही. मार्चमध्ये पुन्हा महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्यामुळे अर्थसंकल्पातील नियोजित कामे करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाGanesh Naikगणेश नाईक