शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून चार कोटींचा मुद्देमाल परत, १९१ गुन्ह्यांमधील ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 04:13 IST

शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

नवी मुंबई  - शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी त्यांनी रेहान कुरेशीच्या प्रकरणात केलेल्या तपासाबाबत नवी मुंबईपोलिसांचीही पाठ थोपटली.पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या विविध गुन्ह्यांची गत कालावधीत उकल झालेली आहे. त्यानुसार १९१ गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४ कोटी ३ लाख १९१ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केलाआहे.पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत केला. त्यामध्ये ८९ वाहने व ६३ सोन्याच्या दागिन्यांचा तसेच मोबाइल व रोख रकमेचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गुन्ह्यांची उकल करून त्यामध्ये जप्त केलेला ऐवज तक्रारदारांना परत करणे हा पोलिसांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासाठी न्यायालयाची अत्यंत कठीण प्रक्रिया असून नवी मुंबई पोलिसांनी तीवेळेत पूर्ण केल्याचेही समाधान व्यक्त केले.नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून आठ वर्षांपासून सीआयडी तसेच पोलिसांना चकमा देणाऱ्या रेहान कुरेशीला अटक केल्याबद्दल देखील नवी मुंबई पोलिसांची कौतुकाने पाठ थोपटली. पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा असते, तर गुन्हेगारांना कसलीही मर्यादा नसते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने आपल्या हद्दीसह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमास पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, उपआयुक्त पंकज डहाणे, सुधाकर पठारे, अशोक दुधे, राजेश बनसोडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी पोलिसांसाठी उभारण्यात आलेली व्यायामशाळा, महिला सहाय्यता कक्ष तसेच पोलीस व त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी फिरते रुग्णालय यांचा शुभारंभ महासंचालकांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलिसांसाठी २५० हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील वाहतूककोंडी व जप्तीची वाहने यांची मोठी समस्या ठरत असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.गुन्ह्यामध्ये अथवा अपघातात जप्त केलेले वाहन विम्याचा कालावधी संपल्यानंतर संबंधितांकडून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशी २४४ असून त्यापैकी १०६ वाहनांची विल्हेवाट आजवर लावली असून १०८ वाहनांची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एखाद्या गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची अपेक्षा राहत नाही. मात्र पोलिसांकडून कौशल्यपूर्ण तपासाअंती चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याची भावना तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षकअरविंद जयकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस