शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पोलिसांकडून चार कोटींचा मुद्देमाल परत, १९१ गुन्ह्यांमधील ऐवज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 04:13 IST

शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

नवी मुंबई  - शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी त्यांनी रेहान कुरेशीच्या प्रकरणात केलेल्या तपासाबाबत नवी मुंबईपोलिसांचीही पाठ थोपटली.पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या विविध गुन्ह्यांची गत कालावधीत उकल झालेली आहे. त्यानुसार १९१ गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४ कोटी ३ लाख १९१ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केलाआहे.पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत केला. त्यामध्ये ८९ वाहने व ६३ सोन्याच्या दागिन्यांचा तसेच मोबाइल व रोख रकमेचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गुन्ह्यांची उकल करून त्यामध्ये जप्त केलेला ऐवज तक्रारदारांना परत करणे हा पोलिसांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासाठी न्यायालयाची अत्यंत कठीण प्रक्रिया असून नवी मुंबई पोलिसांनी तीवेळेत पूर्ण केल्याचेही समाधान व्यक्त केले.नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून आठ वर्षांपासून सीआयडी तसेच पोलिसांना चकमा देणाऱ्या रेहान कुरेशीला अटक केल्याबद्दल देखील नवी मुंबई पोलिसांची कौतुकाने पाठ थोपटली. पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा असते, तर गुन्हेगारांना कसलीही मर्यादा नसते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने आपल्या हद्दीसह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमास पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, उपआयुक्त पंकज डहाणे, सुधाकर पठारे, अशोक दुधे, राजेश बनसोडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमप्रसंगी पोलिसांसाठी उभारण्यात आलेली व्यायामशाळा, महिला सहाय्यता कक्ष तसेच पोलीस व त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी फिरते रुग्णालय यांचा शुभारंभ महासंचालकांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलिसांसाठी २५० हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील वाहतूककोंडी व जप्तीची वाहने यांची मोठी समस्या ठरत असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.गुन्ह्यामध्ये अथवा अपघातात जप्त केलेले वाहन विम्याचा कालावधी संपल्यानंतर संबंधितांकडून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशी २४४ असून त्यापैकी १०६ वाहनांची विल्हेवाट आजवर लावली असून १०८ वाहनांची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एखाद्या गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची अपेक्षा राहत नाही. मात्र पोलिसांकडून कौशल्यपूर्ण तपासाअंती चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याची भावना तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षकअरविंद जयकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस