शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 2:00 AM

मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मधुकर ठाकूर -उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या उरण -नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणगिरी, न्हावा -शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.यामुळे ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो गरीब- गरजु प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहाण्याची पाळी आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जानेवारी  २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.उरण-नेरुळ मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे.उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणगिरी, न्हावा -शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या ,मोठमोठे कुलर,नळ जोडण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र अद्यापही चारही स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

आधीच उरणचा उष्म्याचा पाराने ४२ डिग्री पर्यंत चढल्याने प्रवासी पुरते घामाघूम होऊन लागले आहेत.मात्र उरण, द्रोणगिरी, न्हावा शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने गरीब- गरजु प्रवाशांवर पाण्यावाचून घसा कोरडा पडू लागला आहे.तसेच या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अद्यापही शौचालयाची सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे सध्या प्रवाशांची पाणी आणि शौचालयाच्या अभावामुळे मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

 चारही स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने सध्या फक्त कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्याची मुभा कर्मचारी काही वेळा प्रवाशांना इमरजन्सी परिस्थितीत करण्यासाठी देतात.मात्र आता  चारही स्थानकांवरील साफसफाईच्या कामाच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे.ठेकेदाराला साफसफाईच्या कामाची मुदत अद्यापही वाढवून देण्यात आली नसल्याने मागील दोन दिवसांपासून ठेकेदारांनी साफसफाईची कामे बंद केली आहेत.परिणामी स्थानक परिसर व सध्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयात साफसफाई अभावी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याच्या संतप्त  प्रतिक्रिया रेल्वे कामगारांकडूनच व्यक्त करण्यात येत आहेत.

 उरण-नेरुळ मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे.यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.तसेच अद्यापही या चारही स्थानकांवर अद्यापही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही सोय करण्यात आलेली नाही.यामुळे गैरकृत्यांना ऊत आला आहे.मध्यरेल्वे प्रशासनाच्या सुरू असलेल्या अशा या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या गैरसोयींबाबत अधिक माहिती घेऊन कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला कळवितो असे मध्यरेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी एस.के.जैन यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई