शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ऑन द स्पॉट शाळेतच मुलाखती, पण प्रक्रिया गुलदस्त्यात; पालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

By नारायण जाधव | Updated: June 26, 2023 17:48 IST

सोमवारी सकाळी थेट या शाळेतच तातडीने शिक्षकांच्या मुलाखती आयोजित करून ३० शिक्षक पुढील तीन ते चार दिवसांत दिले जातील असे आश्वासन देऊन पालकांचा रोष शांत केला. 

नवी मुंबई : गेली दोन वर्षे शिक्षक देण्यास टाळाटाळ करीत असलेल्या महापालिका प्रशासनाला कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेच्या पालकांनी दिलेल्या ‘आता मुख्यालयात शाळा” या इशाऱ्यानंतर थोडे नमते घ्यावे लागले. सोमवारी सकाळी थेट या शाळेतच तातडीने शिक्षकांच्या मुलाखती आयोजित करून ३० शिक्षक पुढील तीन ते चार दिवसांत दिले जातील असे आश्वासन देऊन पालकांचा रोष शांत केला. 

शाहू महाराजांची जयंती असल्याने पालकांनी शाळेबाहेर त्यांना अभिवादन करून मुलांना शाळेत सोडून घरी गेले.मात्र, ही शिक्षक भरती पालिका प्रशासन करीत आहे की दुसरी कोणती संस्था. ही शाळा पालिका चालवणार आहे की कोणती संस्था हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. कारण मुलाखतीप्रसंगी खासगी व्यक्तींची लुडबुड अधिक दिसून आली. 

शिक्षकभरती निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन गेले वर्षे दीड वर्षे ही भरती रखडली होती. बुधवारी पालिका मुख्यालयात पालकांबरोबर बैठक झाली. मात्र, यात तांत्रिक अडचण असल्याने आंम्ही शिक्षक भरती लगेच करू शकत नाही, असे सांगून  महापालिकेच्या इतर शाळेतील सहा शिक्षक या शाळेत पाठवले होते. मात्र, गुरुवारच्या आंदोलनाच्या पाश्व"र्वभूमीवर आमदार गणेश नाईक यांनी पालकांची बुधवारी बैठक घेतली. यात ग शाळेत तातडीने ३० शिक्षक हजर होतील असे आश्वासन दिले. त्यानंतर पालक मुख्यालयात न जात मुलांना घेवून सकाळी आठ वाजतात शाळेत गेले. शाळेत शिक्षकांच्या मुलाखती सुरू आहेत असे सांगण्यात आल्यानंतर मुलांना पालकांनी शाळेत पाठवले. त्यानंतर दोन तास भर पावसात पालक शाळेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसले. त्यानंतर माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक यांच्यासह पालिकेचे उपायुक्त दत्तात्रय धनवट, शाळेचे मुख्याद्यापक मारुती गवळी, रा.फ नाईकचे मुख्याद्यापक यांच्यासह काही संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित होते.यावेळी पालिका उपायुक्त धनवट यांनी आपल्या मागणीनुसार शिक्षकभरती सुरू केली असून दोन तीन दिवसात शाळेला आवश्यक शिक्षक मिळतील असे सांगितले. तर माजी खासदार संजीव नाईक यांनी आंम्ही शाळा बंद करण्यासाठी सुरू केलेली नाही. गोरगरिबांच्या मुलांना सीबीएसई माध्यमाचे मोफत शिक्षण मिळावे म्हणून ही शाळा सुरू केली असून या शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे आश्वासीत करीत  आता तुंम्ही बिनधास्त घरी जा शाळा सुरळीत सुरू होईल असे सांगितल्यानंतर पालक घरी गेले.

शिक्षक भरती करतेय कोण -आतापर्यंत तातडीने शिक्षक देणे शक्य नसल्याचे ठामपणे सांगत असताना सोमवारी थेट शाळेत शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एका रात्रीत हे शिक्षक उमेदवार कुठून आले असा प्रश्न आता पालकांना पडला असून ही भरती नेमके करतेय कोण असाही सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे.

पालकांना आश्वासीत करणाऱ्या त्या दोन महिला कोण -यावेळी पालकांना दोन महिलांनी आश्वासीत केले. त्यांनी आमचा २० ते २५ वर्षे सीबीएसई माध्यमाशी संबंधित अनुभव असून आता तुंम्ही काळजी करू नको. चांगल्या दर्जाचे शिक्षक तुंम्हाला मिळतील. दोन ते तीन दिवसात शाळा सुरळीत सुरू होईल. आता तुमची मुलं आमची जबाबदारी आहे. तुंम्ही निर्धास्त राहा, असे सांगितले. मात्र त्या दोन महिला कोण अशी चर्चा त्यानंतर पालकांमध्ये होती.

शाळा चालवणार कोण -आज शाळेत एका सामजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. पण ही संस्था कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनच एका संस्थेच्या हाती देण्याच्या हालाचाली सुरू आहेत. या शाळेतील पूर्वीच्या शिक्षक मुख्याद्यापकांसह सर्व स्टापला गरज पडल्यास तुमची दुसऱ्या शाळेत बदली केली जाईल असे संकेतही देण्यात आले आहत. त्यामुळे गेली दोन वर्षे शिक्षक नसताना कष्ट घेणाऱ्या पालिकेच्या त्या शिक्षकांमध्येही अस्वस्थतता आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका