शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामात अडथळा; शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:53 IST

अगोदर पुनर्वसन करा, मगच विद्युत वाहिन्या भूमिगत करा, अशी मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पासाठी उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्या लागणार आहेत. त्यानुसार सिडकोने कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे; परंतु या विद्युत वाहिनीखालील जमिनी कसणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्याने या कामात मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. अगोदर पुनर्वसन करा, मगच विद्युत वाहिन्या भूमिगत करा, अशी मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे.विमानतळाच्या गाभा क्षेत्रातून टाटा पॉवर कंपनीची अतिउच्चदाबाची ओव्हरहेड लाइन गेली आहे. विमानतळाच्या कामात या विद्युत लाइनचा मोठा अडथळा निर्माण झाल्याने त्या भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, या विद्युत वाहिनीखालील जमीन कुळ असलेल्या ११४ शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. १९३० पासून आपण ही जमीन कसत असल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याअगोदर त्याखालील जमिनीच्या संपादनापोटी मोबदला मिळावा, अशी मागणी पारगाव, पारगाव डुंगी व कोल्ही येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांनी थेट राज्य सरकार, सिडको, कोकण विभागीय आयुक्त, महसूल विभाग आदीकडे लेखी निवेदन दिले आहे.शेतकºयांच्या या मागणीची दखल घेत, राज्य सरकारने टाटा पॉवर लाइनखालील जमीन कसणाºया शेतकºयांना अनुदान देण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. या पार्श्वभूमीवर सिडकोने २०१४ मध्ये कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी पनवेलचे प्रांत अधिकारी यांना अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु आजतागायत प्रांत किंवा कोकण विभागीय आयुक्तांनी याबाबत कोणताही अहवाल सिडकोला दिला नसल्याचे पारगावचे शेतकरी व दहा गाव प्रकल्पबाधित समितीचे सदस्य नंदकुमार भोईर यांनी स्पष्ट केले आहे.सिडकोने विमानतळबाधित दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांचे साडेबावीस टक्के भूखंड देऊन पुनर्वसन केले त्याच धर्तीवर टाटा पॉवर लाइनखालील जमीन कसणाºया शेतकºयांचेदेखील सिडकोने पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तुटपुंजे अनुदान देऊन प्रकल्पग्रस्तांची बोळवण करण्याचा प्रयत्न सिडकोच्या अधिकाºयांनी केला, तर विमानतळ प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा येथील ११४ प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.पूर्वीचा मोबदला अत्यल्पमुंबईला विद्युत पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या टाटा इलेक्ट्रिक कंपनीच्या टॉवरसाठी येथील शेतकºयांच्या १९३० मध्ये जमिनी संपादित करण्यात आल्या. संपादित केलेल्या शेतकºयाच्या सुमारे १७.५ हेक्टर जमिनीचा मोबदला अल्प प्रमाणात देण्यात आला; परंतु या विद्युत वाहिन्यांखालील जमीन आजतागायत येथील शेतकºयांच्या ताब्यात असून, त्यावर ते भातशेती करीत आहेत. आता ही जमीन विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे, त्यामुळे अन्य विमानतळ प्रकल्पाासाठी संपादित करण्यात आलेल्या अन्य जमिनीप्रमाणेच आम्हालाही पुनर्वसनाचा लाभ मिळावा, अशी येथील ११४ शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई