शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

घर सोडून आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: December 31, 2014 01:53 IST

विविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

अनिकेत घमंडी - डोंबिवलीविविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. १८ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत कल्याणसह मुंबईतील रेल्वे स्थानकांत पळून आलेली तब्बल २२० मुले सापडली आहेत. दादर-ठाण्यात कार्यरत असलेल्या ‘समतोल फाऊंडेशन’च्या सर्व्हेक्षणातून ही गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईच्या बालसुधार गृहांत अशा मुलांना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे या मुलांची रवानगी नेमकी कुठे करायची? हा प्रश्न उभा राहिला आहे, संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘रेल्वे स्थानकांमध्ये अल्पवयीन मुले आढळले की, त्याची विचारपूस करत सुरक्षा यंत्रणेच्या कानावर ही बाब घातली जाते. मुलांना तातडीने बालसुधारगृहात पाठवले जाणे आवश्यक असते. मात्र आता या सुधारगृहांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे केवळ सर्व्हे करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. लांबपल्याच्या गाड्या ज्या स्थानकांमध्ये येतात त्या ठिकाणी प्रामुख्याने अशा मुलांची संख्या अधीक असते. त्यातही ठाणे, कुर्ला, दादर या स्थानकांपेक्षाही कल्याण आणि सीसएसटीमध्ये ते जास्त लवकर आढळतात,’ असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण जंक्शन मध्ये तीन दिवसांत ७० तर सीएसटी स्थानकात तब्बल १५० मुले आढळली. सामाजिक संस्थांची भूमिकाच्पळून आलेल्या मुलांशी मैत्री करून त्यांच्यावर शिबिराच्या माध्यमातून संस्कार केले जातात. त्यानंतर हळुहळू कुटुंबाविषयी माहिती घेतली जाते. खरी माहिती मिळाल्याची खात्री पटली की, त्यांच्या देशभरात कुठेही असलेल्या पालकांशी संपर्क साधणे, त्यांना सर्व माहिती देत मुले सुखरुप असल्याचा विश्वास देणे आदी कामे सुरक्षा यंत्रणांच्या सहाय्याने केली जातात. त्यानंतर मुले पालकांच्या स्वाधीन केली जातात.संस्थेसमोरील अडचणी : कल्याणहून भिवंडीच्या बालसुधारगृहात एखाद्या मुलाला न्यायचे असेल तर त्यासाठी सुमारे १५० रु. खर्च होतो, हा खर्च नेमका करायचा कोणी, हा प्रश्न आहे. संस्थेसमोर खर्चाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे इच्छाशक्ती प्रचंड असली तरी कामात अडचणी येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.कलेक्टरचे सहकार्य हवे : जिल्हाधिकाऱ्यासह बालकल्याण समितीने या संदर्भात सहकार्य करणे अपेक्षित असून १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालसुधारगृहातील मुलाचे अपहरणभिवंडी : कचेरीपाडा येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना काल पहाटे ५-१०च्या सुमारास घडली. या मुलाचे नांव इजाज फिरोज शाह(७) असे आहे. कोणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार बालसुधारगृहातील वैभव भगवान वेल्हाळ यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.