शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घर सोडून आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: December 31, 2014 01:53 IST

विविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

अनिकेत घमंडी - डोंबिवलीविविध कारणांमुळे घरातून पळून मुंबईत आलेल्या १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. १८ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत कल्याणसह मुंबईतील रेल्वे स्थानकांत पळून आलेली तब्बल २२० मुले सापडली आहेत. दादर-ठाण्यात कार्यरत असलेल्या ‘समतोल फाऊंडेशन’च्या सर्व्हेक्षणातून ही गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईच्या बालसुधार गृहांत अशा मुलांना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे या मुलांची रवानगी नेमकी कुठे करायची? हा प्रश्न उभा राहिला आहे, संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘रेल्वे स्थानकांमध्ये अल्पवयीन मुले आढळले की, त्याची विचारपूस करत सुरक्षा यंत्रणेच्या कानावर ही बाब घातली जाते. मुलांना तातडीने बालसुधारगृहात पाठवले जाणे आवश्यक असते. मात्र आता या सुधारगृहांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे केवळ सर्व्हे करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येत आहे. लांबपल्याच्या गाड्या ज्या स्थानकांमध्ये येतात त्या ठिकाणी प्रामुख्याने अशा मुलांची संख्या अधीक असते. त्यातही ठाणे, कुर्ला, दादर या स्थानकांपेक्षाही कल्याण आणि सीसएसटीमध्ये ते जास्त लवकर आढळतात,’ असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण जंक्शन मध्ये तीन दिवसांत ७० तर सीएसटी स्थानकात तब्बल १५० मुले आढळली. सामाजिक संस्थांची भूमिकाच्पळून आलेल्या मुलांशी मैत्री करून त्यांच्यावर शिबिराच्या माध्यमातून संस्कार केले जातात. त्यानंतर हळुहळू कुटुंबाविषयी माहिती घेतली जाते. खरी माहिती मिळाल्याची खात्री पटली की, त्यांच्या देशभरात कुठेही असलेल्या पालकांशी संपर्क साधणे, त्यांना सर्व माहिती देत मुले सुखरुप असल्याचा विश्वास देणे आदी कामे सुरक्षा यंत्रणांच्या सहाय्याने केली जातात. त्यानंतर मुले पालकांच्या स्वाधीन केली जातात.संस्थेसमोरील अडचणी : कल्याणहून भिवंडीच्या बालसुधारगृहात एखाद्या मुलाला न्यायचे असेल तर त्यासाठी सुमारे १५० रु. खर्च होतो, हा खर्च नेमका करायचा कोणी, हा प्रश्न आहे. संस्थेसमोर खर्चाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे इच्छाशक्ती प्रचंड असली तरी कामात अडचणी येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.कलेक्टरचे सहकार्य हवे : जिल्हाधिकाऱ्यासह बालकल्याण समितीने या संदर्भात सहकार्य करणे अपेक्षित असून १२ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालसुधारगृहातील मुलाचे अपहरणभिवंडी : कचेरीपाडा येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना काल पहाटे ५-१०च्या सुमारास घडली. या मुलाचे नांव इजाज फिरोज शाह(७) असे आहे. कोणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार बालसुधारगृहातील वैभव भगवान वेल्हाळ यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.