शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 23:43 IST

माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली.

नवी मुंबई : दिव्यस्मरण महोत्सव प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समाजाने फक्त सुशिक्षित होऊन उपयोगी नाही तर सुसंस्कृतही झाले पाहिजे. माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली. त्यांचा प्रत्येक शब्द हृदयात साठविण्यासारखा होता. ज्या गोष्टींची जिज्ञासा होती त्याचे समाधान विचार ऐकून झाले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या, अशी जीवनविद्या मिशनची सद्गुरू वामनराव पै यांनी व्याख्या केली आहे. विचारांना विवेकाची जोड देण्याचे काम जीवनविद्या मिशनच्या वतीने सुरू असून, समाजाने विज्ञानाची कास धरून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमणा करावी, असे आवाहन प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै यांनी घणसोलीमध्ये केले आहे.सद्गुरू वामनराव पै यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त घणसोलीमध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान दिव्यस्मरण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रल्हाद पै, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. पै यांनी ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात आणि राष्ट्रहितात’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सद्गुरूंनी समाजाला वास्तववादाकडे नेले. आदर्शवाद व दैववादाकडे नेले नाही. प्रयत्नाचे महत्त्व पटवून दिले. विकासवादाचा मार्ग दाखविला. विचारांची आणि विज्ञानाची कास धरून चांगले शिक्षण दिले. सद्गुरूंनी जगाला दोन संकल्प दिले. जग सुखी व्हावे, राष्ट्र सर्वांगाने प्रगतिपथावर जावे, असे व्हिजन दिल्याचे सांगितले. या वेळी सुरेश हावरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी