शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेक फेल झाल्याने एनएमएमटीचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:23 IST

सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली.

नवी मुंबई : एनएमएमटीचा ब्रेक फेल होऊन तीन वाहनांना धडक दिल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शहरातील बहुतांश ठिकाणचे सिग्नल मागील काही महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत, यामुळे अनेक चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा उडत आहे. त्यात शहरांतर्गतच्या रस्त्यांसह ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल या मुख्य मार्गांचाही समावेश आहे, यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत असतानाच गुरुवारी दुपारी सानपाडा जंक्शन येथे विचित्र अपघात घडला. सायन-पनवेल मार्गावरून एपीएमसीकडे वळण घेणारी एनएमएमटी पुलाखाली रस्ता ओलांडत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला, यामुळे सदर बस रिक्षा, कार व टेम्पो अशा तीन वाहनांना धडकून रस्त्याच्या सुमारे अडीच फुटांच्या दुभाजकावर चढली. यामुळे विरुद्ध दिशेच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनालाही तिची धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. अपघातानंतर सानपाडा पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याची कबुली एनएमएमटी चालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातामध्ये कार, टेम्पो व रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.या दुर्घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. एनएमएमटीच्या नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. अर्ध्या प्रवासात इंधन संपणे, ब्रेक फेल होणे, चाक निखळणे, असे प्रकार एनएमएमटीच्या वाहनांसोबत घडत आहेत, यामुळे त्यांच्या डागडुजी व दुरुस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई