शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

ब्रेक फेल झाल्याने एनएमएमटीचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:23 IST

सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली.

नवी मुंबई : एनएमएमटीचा ब्रेक फेल होऊन तीन वाहनांना धडक दिल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. सुदैवाने अपघाता वेळी रस्त्यावर रहदारी कमी होती, यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शहरातील बहुतांश ठिकाणचे सिग्नल मागील काही महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत, यामुळे अनेक चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा उडत आहे. त्यात शहरांतर्गतच्या रस्त्यांसह ठाणे-बेलापूर व सायन-पनवेल या मुख्य मार्गांचाही समावेश आहे, यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत असतानाच गुरुवारी दुपारी सानपाडा जंक्शन येथे विचित्र अपघात घडला. सायन-पनवेल मार्गावरून एपीएमसीकडे वळण घेणारी एनएमएमटी पुलाखाली रस्ता ओलांडत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला, यामुळे सदर बस रिक्षा, कार व टेम्पो अशा तीन वाहनांना धडकून रस्त्याच्या सुमारे अडीच फुटांच्या दुभाजकावर चढली. यामुळे विरुद्ध दिशेच्या मार्गावरून येणाऱ्या वाहनालाही तिची धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. अपघातानंतर सानपाडा पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याची कबुली एनएमएमटी चालकाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातामध्ये कार, टेम्पो व रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.या दुर्घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. एनएमएमटीच्या नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. अर्ध्या प्रवासात इंधन संपणे, ब्रेक फेल होणे, चाक निखळणे, असे प्रकार एनएमएमटीच्या वाहनांसोबत घडत आहेत, यामुळे त्यांच्या डागडुजी व दुरुस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई