शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:45 IST

गेल्या तीन महिन्यात कर्तव्य बजावताना संसर्ग : प्रशासनाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तीन महिन्यांत नवी मुंबई पोलीस दलातील ९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू चालू महिन्यात झाला आहे, तर कोरोनावर मात न करू शकणारे हे सर्व कोविड योद्धे वयाने पन्नाशीच्या जवळपासचे आहेत.

देशभरात कोरोना पसरू लागताच लॉकडाऊन घोषित केल्यापासून ते आजतागायत नवी मुंबई पोलीस कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन व्हावे व कोरोनाचा संसर्ग टळावा, यासाठी पोलिसांचे कसोटीचे प्रयत्न होते. त्याकरिता संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात नाकाबंदी व बंदोबस्त लावण्यात आला होता. या दरम्यान वरिष्ठांकडून पोलिसांच्या आरोग्याची व कुटुंबाचीही काळजी घेतली जात होती. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत एकही पोलीस कोरोनामुळे दगावला नव्हता. मात्र, जुलैनंतर कोरोनाची झालेली लागण काहींच्या जिवावर बेतली आहे. त्यात अद्यापपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना पोलीस प्रशासनाकडून कोविड योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.कोरोनापासून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करताना स्वत:च्या जिवाची बाजी त्यांनी लावलेली आहे. मार्च महिन्यापासून अद्यापपर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे एक हजार पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, तर अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.

परंतु, नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे सर्व जण उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत.एखाद्या पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यास, त्याच्या लक्षणावरून उपचाराची दिशा ठरवण्यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आली होती. यामुळे प्रकृती चिंताजनक असणाºयांना वेळीच उपचार मिळाल्याने संकट टळत आहे. यानंतरही उपचाराला प्रकृतीने साथ न दिल्याने अद्यापपर्यंत नऊ जणांचा कोरोनामुळे बळी घेतला आहे. त्यात दोन अधिकारी व सात कर्मचाºयांचा समावेश आहे. या सर्वांच्या त्यागाचा प्रशासनाने योग्य सन्मान करत त्यांना कोविड योद्धे असे संबोधले आहे.

मात्र, वाढत चाललेल्या मृत्यूच्या संख्येबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक पोलीस प्रत्यक्ष मैदानावर राहून जनसामान्यांच्या संपर्कात राहून कर्तव्य बजावत होता. या दरम्यान, परराज्यातील लाखो नागरिकांना सुखरूप मूळगावी पोहोचवले. त्यामध्ये अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा होऊनही उपचारांती ते कोरोनावर मात करून बरे झाले. त्यानंतर, जुलै महिन्यात पोलीस हवालदार अविनाश दडेकर यांच्या मृत्यूची पहिली घटना घडली.यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असतानाही आॅगस्ट महिन्यात भास्कर बोंबले व सुरेश म्हात्रे यांचे निधन झाले, तर चालू महिन्यात संदेश गायकवाड, रवींद्र पाटील, राजू कुदळे, सुरेश सूर्यवंशी, शांतीलाल कोळी व विनोद पाटसकर हे कोरोनामुळे मृत्यूच्या दाढेत सापडले.प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिक दक्षतासध्या कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू असल्याने एखाद्या लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे.त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात व बंदोबस्त दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे.त्यानंतरही अवघ्या तीन महिन्यांत नऊ पोलिसांच्या निधनाने नवी मुंबई पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस