शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:45 IST

गेल्या तीन महिन्यात कर्तव्य बजावताना संसर्ग : प्रशासनाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तीन महिन्यांत नवी मुंबई पोलीस दलातील ९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू चालू महिन्यात झाला आहे, तर कोरोनावर मात न करू शकणारे हे सर्व कोविड योद्धे वयाने पन्नाशीच्या जवळपासचे आहेत.

देशभरात कोरोना पसरू लागताच लॉकडाऊन घोषित केल्यापासून ते आजतागायत नवी मुंबई पोलीस कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन व्हावे व कोरोनाचा संसर्ग टळावा, यासाठी पोलिसांचे कसोटीचे प्रयत्न होते. त्याकरिता संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात नाकाबंदी व बंदोबस्त लावण्यात आला होता. या दरम्यान वरिष्ठांकडून पोलिसांच्या आरोग्याची व कुटुंबाचीही काळजी घेतली जात होती. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत एकही पोलीस कोरोनामुळे दगावला नव्हता. मात्र, जुलैनंतर कोरोनाची झालेली लागण काहींच्या जिवावर बेतली आहे. त्यात अद्यापपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना पोलीस प्रशासनाकडून कोविड योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.कोरोनापासून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करताना स्वत:च्या जिवाची बाजी त्यांनी लावलेली आहे. मार्च महिन्यापासून अद्यापपर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे एक हजार पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, तर अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.

परंतु, नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे सर्व जण उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत.एखाद्या पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यास, त्याच्या लक्षणावरून उपचाराची दिशा ठरवण्यासाठी वेलनेस टीम तयार करण्यात आली होती. यामुळे प्रकृती चिंताजनक असणाºयांना वेळीच उपचार मिळाल्याने संकट टळत आहे. यानंतरही उपचाराला प्रकृतीने साथ न दिल्याने अद्यापपर्यंत नऊ जणांचा कोरोनामुळे बळी घेतला आहे. त्यात दोन अधिकारी व सात कर्मचाºयांचा समावेश आहे. या सर्वांच्या त्यागाचा प्रशासनाने योग्य सन्मान करत त्यांना कोविड योद्धे असे संबोधले आहे.

मात्र, वाढत चाललेल्या मृत्यूच्या संख्येबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक पोलीस प्रत्यक्ष मैदानावर राहून जनसामान्यांच्या संपर्कात राहून कर्तव्य बजावत होता. या दरम्यान, परराज्यातील लाखो नागरिकांना सुखरूप मूळगावी पोहोचवले. त्यामध्ये अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा होऊनही उपचारांती ते कोरोनावर मात करून बरे झाले. त्यानंतर, जुलै महिन्यात पोलीस हवालदार अविनाश दडेकर यांच्या मृत्यूची पहिली घटना घडली.यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असतानाही आॅगस्ट महिन्यात भास्कर बोंबले व सुरेश म्हात्रे यांचे निधन झाले, तर चालू महिन्यात संदेश गायकवाड, रवींद्र पाटील, राजू कुदळे, सुरेश सूर्यवंशी, शांतीलाल कोळी व विनोद पाटसकर हे कोरोनामुळे मृत्यूच्या दाढेत सापडले.प्रत्येक पोलीस ठाण्यात अधिक दक्षतासध्या कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरू असल्याने एखाद्या लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे.त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात व बंदोबस्त दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात आहे.त्यानंतरही अवघ्या तीन महिन्यांत नऊ पोलिसांच्या निधनाने नवी मुंबई पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस