शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर: १७,२३० कोटींची गुंतवणूक

By नारायण जाधव | Updated: May 15, 2023 18:48 IST

हिरानंदानी समूहाची टाऊनशिप

नवी मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंक एकीकडे आकार घेत असताना दुसरीकडे देशातील बांधकाम व्यावसायिकांनी नवी मुंबई-पनवेल परिसरात मोठमोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. याच अंतर्गत आता निरंजन हिरानंदानी समूहाच्या परसिपिना डेव्हलपर्स कंपनीने पनवेल-नवी मुंबईच्या वेशीवर नवे शहर वसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित नवी टाऊनशिप पनवेल तालुक्यातील बारवी, भोकरपाडा आणि खालापूर तालुक्यातील पाणशिल-तळेगाव या गावांच्या हद्दीतील १८९ हेक्टर अर्थात ४७२.५ एकर जमिनीवर बांधण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रस्तावित टाऊनशिपमध्ये परसिपिना डेव्हलपर्स कंपनी सुमारे १७२३० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पर्यावरणविषयक मंजुरीसाठी राज्य परिवेश समितीने स्वीकारून तो आपल्या आगामी बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेसमोर ठेवला आहे. परिवेश समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या शहराच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे.

या टाऊनिशपमध्ये ३३४५८ घरेपरसिपिना डेव्हलपर्सच्या या टाऊनशिपमध्ये १७६.४० मीटर उंचीच्या १८२ इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये ३३४५८ घरे बांधण्यात येणार असल्याचे कंपनीने याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे. मात्र, ही किती आकारमानाची असतील, याचा उल्लेख नाही. सुमारे १८९४०१० चौरस मीटर क्षेत्रावर ८२,८५,५९३.८१ चौरस मीटर इतके बांधकाम करण्यात येणार आहे.

विस्तीर्ण पार्किंगची सोयनव्या टाऊनशिपमध्ये ५७८१० चारचाकी आणि १५९५६६ दुचाकी आणि दोन ट्रक च्या पार्किंगची सोय असणार आहे. यामुळे वसाहतील वाहने कुठे पार्क करायची हा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच वाहतूककोंडीही होणार नाही, असे सांगण्यात आले.

३३ एमएलडी पाणी लागणारया टाऊनशिपसाठी ३३ एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, ही गरज महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण भागविणार असून सुरुवातीला बांधकाम सुरू असताना दररोज एक एमएलडी पाणी देण्याची तयारी प्राधिकरणाने दर्शविली असून तसे पत्रही दिले आहे.

बफर एरियात धरणे, नद्या, जलाशयेटाऊनशिपच्या १० किमीच्या बफर क्षेत्रात धरणे, नद्या, जलाशयांचा समावेश आहे. यात काळुंद्री नदी, पाताळगंगा नदी, किरकिरी नदी यासह मोरबे धरण, मोहपाडा, भिलवडे, जांभिवली या जलाशयाचा समावेश आहे.

२१८१ वृक्षांची होणार कत्तलटाऊनशिपच्या परिसरात ११.३० हेक्टर क्षेत्र हरित क्षेत्र राहणार आहे. मात्र, तरीही २१८१ वृक्षांची बांधकामासाठी कत्तल करावी लागणार आहे. या बदल्यात विकासक ११५६३६ इतकी वृक्षलागवड करणार आहे.

तीन महामार्गांना लागून वसाहतप्रस्तावित टाऊनशिप जुना मुंबई-पुणे मार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा या तीन महामार्गांना लागून असणार आहे. शिवाय प्रस्तावित न्हावा-शेवा-शिवडी सी-लिंक हा चिर्ले जंक्शन येथे आंतरमार्गिकांद्वारे या तिन्ही महामार्गांना जोडण्यात येणार आहे. शिवाय प्रस्तावित विरार-अलिबाग काॅरिडोर याच परिसरातून जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई