शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने बघण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 03:49 IST2016-06-24T03:49:42+5:302016-06-24T03:49:42+5:30
सध्या सर्वत्र कोचिंग क्लासचे पेव फुटले आहे. अगदी शिशुवर्गापासून पालक मुलांना कोचिंग क्लासला टाकतात. त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण होत असून शाळेच्या फीपेक्षा

शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने बघण्याची गरज
पनवेल : सध्या सर्वत्र कोचिंग क्लासचे पेव फुटले आहे. अगदी शिशुवर्गापासून पालक मुलांना कोचिंग क्लासला टाकतात. त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण होत असून शाळेच्या फीपेक्षा कोचिंगचीही फी कितीतरी पटीने अधिक असते. राज्यातील शिक्षण पध्दतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील होते. आद्यक्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील होते. विखे-पाटील म्हणाले की, शिक्षणाचा दूरदृष्टीने विचार करून सुरू केलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रि येमुळे दीड लाख विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. मात्र, सध्या राज्य सरकार आणि कोचिंग क्लास चालकांच्या साटेलोट्यांमुळे शिक्षण प्रचंड खर्चीक बनले आहे. शाळेची फी २ हजार रु पये तर क्लासेसची फी २० हजार इतकी आहे. त्यांच्या पालकांनाही शिक्षणाचा खर्च पेलवेनासा होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण क्षेत्रात जी स्थित्यंतरे होत आहेत, त्यामुळे नेमके काय करावे, हे कुणालाच ठावुक नाही. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांवर ताण वाढत असल्याचेही विखे-पाटील यांनी सांगितले. कार्यक्र मासाठी ९६ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, शेकापचे नेते माजी आ. विवेक पाटील, ज्येष्ठ गजलकार आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, शेकापचे नेते काशिनाथ पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष भीमसेन माळी, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, ज्येष्ठ समाजसेवक वीरेंद्र बांठिया, तहसीलदार दिलीप आकडे, ज्येष्ठ कलावंत प्रकाश राणे, अभिनेत्री नयन पवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ, शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.