शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

‘आपले सरकार’वर नवी मुंबईकरांची निराशा; आॅनलाइन अर्ज भरण्यात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:29 AM

‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तालुक्यांमध्ये नवी मुंबईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे नवी मुंबईतील रहिवाशांकडून केल्या जाणा-या अर्जाची पूर्तता करण्यात अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांकडे धाव घ्यावी लागत असून, अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागत आहेत.

नवी मुंबई : ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर तालुक्यांमध्ये नवी मुंबईचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. यामुळे नवी मुंबईतील रहिवाशांकडून केल्या जाणा-या अर्जाची पूर्तता करण्यात अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रांकडे धाव घ्यावी लागत असून, अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागत आहेत.नागरिकांना घरबसल्या सुविधांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘आपले सरकार’ वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात या संकेतस्थळाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, परंतु या संकेतस्थळाचा वापरकर्त्यांपैकी नवी मुंबईकरांची मात्र घोर निराशा होत आहे. आपले सरकारच्या माध्यमातून राज्यातील शासनाच्या ३९ विभागातील ३९९ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या जन्मदाखला, सातबारा, उत्पन्नाचा दाखला याशिवाय शेतीविषयक अथवा विविध परवाने प्राप्त करून घेवू शकत आहे. त्याकरिता वेबसाइटवर स्वत:ची नोंदणी केल्यानंतर आॅनलाइन अर्ज भरला जातो. मात्र हा अर्ज भरतेवेळी ज्यांचे वास्तव्य नवी मुंबईत आहे, त्यांना नवी मुंबईतील एखाद्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यापुढे अडथळा निर्माण झालेला आहे. जिल्ह्याची निवड केल्यानंतर तालुका निवडताना त्यात नवी मुंबईचा उल्लेखच केलेला नाही. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांचा उल्लेख आहे. केवळ नवी मुंबईचा उल्लेख नसल्याने त्या क्षेत्रातील वास्तव्याचे ठिकाण निवडण्यात अडचणी येत आहेत. तालुक्याचाच उल्लेख नसल्याने त्यापुढच्या रकान्यात गावाचा (ग्रामपंचायत) उल्लेख होवू शकत नाही.अर्जाच्या सुरवातीलाच अडथळा निर्माण होवून अर्जदारांची घोर निराशा होत आहे. जन्मदाखला, विवाह नोंदणी, रहिवासी दाखला यासह इतर अनेक दाखल्यांच्या बाबतीत ही समस्या समोर आली आहे. ‘आपले सरकार’ संकेतस्थळ सुरू झाल्यापासून ही परिस्थिती कायम आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई