शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:56 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठा नवी मुंबईतून स्थलांतर करण्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नामदेव मोरेउपमुख्य उपसंपादक

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठा नवी मुंबईतून स्थलांतर करण्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बाजार समितीमध्ये वार्षिक १० हजार कोटी रुपयांचा व्यापार होत असून, थेट एक लाखपेक्षा जास्त नागरिकांना रोजगार मिळत आहे. मार्केट स्थलांतर केल्यास या व्यापाराचे आणि येथील १७९ एकर जमिनीवरील बाजारपेठांचे काय होणार. जवळपास १२ हजार कोटी रुपयांच्या या जमिनीवर नक्की कोणाचा डोळा आहे, याविषयी चर्चांनाही आता उधाण आले आहे.

मुंबईच्या विविध विभागांत विखुरलेल्या कृषी व्यापारामध्ये सुसूत्रता यावी, यासाठी शासनाने १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आणि सर्व कृषी व्यापार एकाच ठिकाणी व्हावा, या उद्देशाने ऐंशीच्या दशकात सर्व बाजारपेठा नवी मुंबईत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सिडकोने तुर्भे विभागात १७९ एकर जमीन उपलब्ध केली. १९८१ मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतरित केले. १९९१ मध्ये मसाला, १९९३ मध्ये धान्य आणि १९९६ मध्ये भाजीपाला व फळ व्यापार नवी मुंबईत हलविला. येथे व्यापाराची घडी बसत असतानाच, मॉडेल ॲक्ट, नियमनमुक्ती, थेट विक्री परवाना, यामुळे बाजार समितीचे अधिकार कमी केले. आता तर बाजारपेठ नवी मुंबईतून स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

खरे तर सुरुवातीला बाजार समितीने मार्केट विस्तारासाठी उरण परिसरात जमीनीची चाचपणी सुरू केली होती. यानंतर, नवी मुंबई महापालिकेने बाजार समिती व्यवस्थापनाशी चर्चा करून शासनाच्या सूचनेवरून १४ गाव परिसरात आणि इतर ठिकाणी जागा मिळेल का, याविषयी चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. पालघर आणि इतर ठिकाणच्या पर्यायांविषयीही चर्चा होऊ लागली आहे.

बाजार समिती स्थलांतरणाविषयी आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईतून कृषी व्यापार बाहेर स्थलांतर करून येथील जमीन ताब्यात घेतली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी १७९ एकर जमिनीवर बाजार समितीची पाच मार्केट वसविली आहेत. सायन - पनवेल महामार्गाला लागून असलेल्या या जमिनीला सोन्याचा भाव आहे. सर्वसाधारण बाजारमूल्याप्रमाणे येथील जमिनीचा भाव जवळपास १ लाख ६२ हजार प्रतिचौरस मीटर एवढा आहे. खुल्या बाजारात हे दर अजून जास्त आहेत. बाजार समितीच्या सर्व जमिनीची किंमत जवळपास १२ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. बाजार समिती स्थलांतर केल्यास ही जमीन कोणाच्या ताब्यात जाणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एखाद्या मोठ्या उद्योजकांचा डोळा या जमिनीवर नाही ना, अशी शंकाही उपस्थित होऊ लागली असून, नक्की काय होणार, याविषयी अद्याप संभ्रमावस्था आहे. व्यापारी व कामगारांनीही जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत शांत राहायचे, अशी भूमिका घेतली आहे.

मॅफ्को व ट्रक टर्मिनलचे उदाहरणशासनाचे मॅफ्को महामंडळ बंद पडल्यानंतर ती जागा सिडकोने ताब्यात घेऊन ती नियमाप्रमाणे विकासकांना दिली आहे. ट्रक टर्मिनलच्या जागेवर सिडकोनेच पंतप्रधान आवासचा निवासी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या धर्तीवर एपीएमसीची जागाही व्यापारी किंवा निवासी प्रकल्पांसाठी दिली जाण्याची भीती सतावू लागली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईMarketबाजार