शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:27 AM

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. परंतु शनिवारी उलवे टेकडीच्या उत्खननासाठी पेरलेल्या सुरुंगाच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या उत्खननाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा असलेला विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी विमानतळाच्या कामात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडली आहे. विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबईला ख-या अर्थाने ग्लोबल लूक प्राप्त होणार आहे. देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून या विमानतळाला मान मिळणार आहे. या विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके या कंपनीची ठेकेदार म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहे. यात नदीचे पात्र बदलणे, उलवे टेकडीची उंची कमी करणे, उच्च विद्युत दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि जमिनीचे सपाटीकरण आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.विशेष म्हणजे भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, परंतु वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला संमिश्र विरोध आहे. टेकडीच्या उत्खननामुळे गावांतील घरांना तडे जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या विरोधात येथील ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढला होता. यातच ही दुर्घटना घडल्याने हा विरोध आणखी तीव्र होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.तसे झाल्यास टेकडी उत्खननाच्या कामाला खीळ बसून त्याचा फटका संपूर्ण विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी प्रकल्पपूर्व कामांत कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सहकार्य करण्याचे सिडकोचे आवाहन उलवे टेकडीचे काम अत्यंत नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. त्यातही शनिवारची दुर्दैवी घटना घडली. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गावांनी स्थलांतरित होणा-या गावांतील अनेक ग्रामस्थांनी संमतीपत्रे दिली आहेत. पुनर्वसन आणि पुन:स्थापन योजनेअंतर्गतचा लाभ ही स्वीकारला आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष स्थलांतर केले जात नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ