शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नवी मुंबई महापालिकेने थकविले २२९ कोटींचे पाणीबिल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:17 AM

- नामदेव मोरे नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही महानगरपालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. १९९२ पासून पाणीबिलाच्या ...

- नामदेव मोरेनवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असूनही महानगरपालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. १९९२ पासून पाणीबिलाच्या थकबाकीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तब्बल २२९ कोटी २६ लाख रुपये थकबाकी आहे. थकीत रक्कम पालिकेकडून वसूल करावी, अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.एमआयडीसीमधील झोपडपट्टी परिसराला अद्याप मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जात नाही. एमआयडीसीकडून पाणी विकत घेतले जात आहे. पर्यायी व्यवस्था असावी म्हणून एमआयडीसीकडून पाणी विकत घेतले जात असल्याचे कारण पालिकेकडून देण्यात येते. एमआयडीसीकडून ३३ ठिकाणी मुख्य नळजोडणी घेण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक महिन्याला सव्वादोन ते अडीच कोटी रुपये बिल भरावे लागते. आॅगस्ट महिन्यामध्ये पालिकेला दोन कोटी ३७ लाख ६५ हजार रुपये बिल एमआयडीसीने पाठविले आहे. पालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याचे आलेले बिल भरले जात आहे; परंतु यापूर्वीची थकीत रक्कम भरली जात नाही. १९९२ पासून थकबाकीचे भिजते घोंगडे कायम आहे. महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल २२९ कोटी २६ लाख ७८ हजार रुपये थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे.महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिका एमआयडीसीचे प्रत्येक महिन्याचे पाणीबिल भरत आहे. जुन्या थकबाकीचा व त्यावरील दंड व व्याजाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो निकाली काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले; परंतु याविषयी अधिकृतपणे कोणीही माहिती दिलेली नाही. शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, याविषयी वस्तुस्थिती काय आहे याविषयी माहिती घेऊन सोमवारी तपशील देऊ, अशी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक यांनी याविषयी एमआयडीसीला पत्र देऊन थकबाकी वसूल करावी. पैसे भरले नाहीत तर संबंधितांची नळजोडणी खंडित करावी, अशी मागणी केली आहे. याविषयी उचित कारवाई झाली नाही तर शासनस्तरावरही तक्रार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबितमहापालिकेची स्थापना झाल्यानंतर एमआयडीमधील झोपडपट्टी परिसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आली. झोपडपट्टीची संख्या वाढल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही महापालिकेवर आली आहे. सद्यस्थितीमध्ये दिघा ते बेलापूरपर्यंत झोपडपट्टीमध्ये पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन झोपडपट्टीवासीयांना पुरविले जात आहे. थकबाकीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही.सामान्य नागरिकांनी पाणी किंवा इतर कर थकविले की महापालिका तत्काळ संंबंधितांवर कारवाई करते; परंतु पालिकेने स्वत:च जवळपास २२९ कोटी रुपये थकविले असल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. ही थकबाकी एमआयडीसीने वसूल करावी, यासाठी आम्ही पत्र दिले आहे. थकबाकी न भरल्यास कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.- अमोल नाईक,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका