शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोत्तम शहरामध्ये ‘नवी मुंबई’चा समावेश, देशातील लोकाभिमुख नागरी सुविधा देणारे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:48 IST

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे.

नवी मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. २४ तास पाणीपुरवठा व सर्वोत्तम नागरी सुविधा देणाºया शहराला अजून एक बहुमान प्राप्त झाला आहे.देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबईची यापूर्वीच निवड झाली आहे. यानंतर आता देशातील जगण्यायोग्य शहरामध्येही नवी मुंबई पुण्यानंतर दुसºया स्थानावर आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १११ शहरांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ‘फिजिकल, इन्स्टिट्यूशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल’ अशा चार मुख्य निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.या चार निकषांमधील ‘इन्स्टिट्यूशनल’ निकषात गव्हर्नन्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, आॅनलाइन सर्व्हिसेस यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होऊन देशातील सर्वोत्तम प्रशासन प्रणाली राबविणारे शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका प्रथम क्र मांकाचे शहर ठरले. यामध्ये जनतेला लाभदायक प्रशासकीय सेवा पुरविणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, तक्र ार निवारण प्रणाली नागरिकांना समाधानकारक अशा कालमर्यादित पद्धतीने राबविणे, अशा विविध गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशातील १११ शहरांमध्ये सर्वोत्तम ठरली.‘फिजिकल’ निकषात गृहनिर्माण, मोकळ्या जागा, ऊर्जास्रोत, पाणीपुरवठा अशा बाबींचा समावेश होता. तसेच ‘सोशल’ निकषात शिक्षण व आरोग्य त्याचप्रमाणे ‘इकोनॉमिकल’ निकषात अर्थकारण व रोजगार अशा बाबींचा समावेश होता. या चार निकषांच्या अनुषंगाने देशातील १११ शहरांचे परीक्षण करण्यात आले. साधारणत: चार महिने केंद्र सरकारच्या परीक्षण समितीमार्फत कागदपत्रे तपासणी व प्रत्यक्ष भेटी याद्वारे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ५८.०२ गुणांकन प्राप्त करून देशातील द्वितीय क्र मांकाचे निवासयोग्य शहर म्हणून मानांकित ठरले. या क्र मवारीत नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा केवळ ०.०९ गुणांनी पुणे हे शहर पुढे असून (५८.११) त्यानंतर मुंबई, तिरु पती व चंदिगढ ही तृतीय, चतुर्थ व पंचम क्रमांकाची शहरे आहेत. या पुरस्कारामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. भविष्यातही नवी मुंबईमध्ये वास्तव्य करणाºयांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करूनदेण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.

सोयी-सुविधास्वातंत्र्यानंतर स्वत:चे धरण विकत घेणारी देशातील एकमेव महानगरपालिका२४ तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिकाघनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम यंत्रणाअत्याधुनिक तंत्रावर आधारित डम्पिंग ग्राउंडदेशातील सर्वात उत्तम व अत्याधुनिक तंत्रावर आधारित मलनि:सारण केंद्रखासगी व महापालिका रुग्णालयाचे विभागनिहाय जाळेदेशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शहराची ओळखदेशातील सर्वात जास्त जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम असलेले शहररेल्वे व रस्त्यांच्या जाळ्यामुळे दळणवळणाची सर्वोत्तम सुविधाएमआयडीसी, एपीएमसी व जेएनपीटीमुळे रोजगाराच्यासंधीमहापालिका क्षेत्रामध्ये १५६ उद्याने, ६७ मोकळ्या जागा, ८ ट्री बेल्टचा समावेशनवी मुंबई महानगरपालिकेला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पालिकेच्या स्थापनेपासून केलेल्या लोकाभिमुख कामांची ही पोचपावती असून हा सर्व सन्मान सर्व नवी मुंबईकरांचा आहे.- जयवंत सुतार,महापौर, नवी मुंबईमहानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचा स्तर उंचावण्यावर व दर्जा राखण्यावर विशेष भर देत आहे. देशातील द्वितीय मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस लाभले आहे. येथील जनतेचे राहणीमान उंचाविण्यासाठी महानगरपालिका करत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.- डॉ. रामास्वामी एन.,महापालिका आयुक्तमहापालिकेला मिळालेले पुरस्कार२००५ - ६ - संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये सन २००५ - ६ मध्ये प्रथम क्रमांकसर्व शिक्षा अभियानामध्ये २००७ - ८ व २००८ - ९ मध्ये प्रथम क्रमांकस्वच्छ भारत अभियान २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशात प्रथम क्रमांकस्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये २०१७ मध्ये राज्यात प्रथम व देशात ८ वा क्रमांक५ मे २०१७ रोजी नागरी विकास दिनाच्या निमित्ताने कचरा विभाजनमधील उल्लेखनीय कामगिरीकरिता पुरस्कार५ मे २०१७ मध्ये नागरी विकास दिनाच्या निमित्ताने सर्वाधिक करवसुलीकरिता पुरस्कारमहापालिका मुख्यालय हरित इमारत बांधकाम तत्त्वानुसार हुडकोचा २०१५ - १६ साठी पुरस्कारजेसीबी क्लीन अर्थ या संस्थेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी उत्कृष्ट कामगिरीसाठी २०१५ चा पुरस्कारईपीसी वर्ल्ड मीडिया समूहाच्या वतीने क्षेपणभूमी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास २०१४ मध्ये पुरस्कार२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरूस्ती सेवेबद्दल राष्ट्रीय नागरी जलपुरस्कारराज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट नागरी आयसीटी पुरस्कारपालिकेच्या अपंग विद्यार्थ्यांकरिता शिक्षण व प्रशिक्षणासाठी पुरस्कार२०१० मध्ये संकलित पावसाळी पाणी निचरा पद्धतीकरिता राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार२००९ मध्ये सांडपाणी व स्वच्छता सेवांमधील विकास कार्याकरिता सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार२००९ मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाचा वसुंधरा पुरस्कार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या