शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

२०१९ साली नवी मुंबईतून होणार विमान उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:16 AM

स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला

नवी मुंबई : स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला; परंतु आम्ही सत्तेवर येताच हा प्रश्न मार्गी लावला, असे सांगत २०१९ साली या विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पायाभरणी आणि जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उलवे येथे झाले. या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूनक व नौकानयनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू उपस्थित होते. येत्या काळात देशातील बंदर विकास आणि जहाज बांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.देशात आतापर्यंत एव्हिएशन पॉलिसी नव्हती. ती पॉलिसी आमच्या सरकारने तयार केली आहे. याअंतर्गत देशभरात आता लहान-मोठ्या १०० विमानतळांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ९०० नवीन विमाने खरेदी केली जाणार आहेत.पायात हवाई चप्पल घालणाºया सर्वसामान्य नागरिकालाही हवाई सफारी करता यावी, हे सरकारचे धोरण असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी या वेळी व्यक्त केले. वीस वर्षे रखडलेला विमानतळ प्रकल्प केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे मार्गी लागला. असे असले तरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे योगदान मोठे असल्याचे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी