शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सक्तीच्या वीजबिलाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा, नवी मुंबई भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 09:13 IST

नवी मुंबई :  वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी ...

नवी मुंबई :  वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत, अशी माहिती शुक्रवारी २२ जानेवारी रोजी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांचे रोजगार गेले असून, व्यवसाय बंद झाले आहेत. याकाळात महावितरणने रिडिंग न घेता सरासरी वीजबिल पाठविली आहेत. याकाळात विजेचे दरदेखील वाढविण्यात आले असून, सक्तीने वीजबिलांची वसुली करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडण्याचे फर्मान राज्य सरकारने काढले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाढीव वीजबिल रद्द करावीत आणि सक्तीने वीजबिल वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली. ३०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. हे आश्वासन खोटे ठरले. कठीण काळामध्ये सरकारने जनतेला दिलासा द्यायला हवा, परंतु या सरकारने जनतेला उद्ध्वस्त करण्याचे ठरवले असल्याचा आरोप माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने अन्यायाची परिसीमा केली आहे. या सरकारचा मनमानी कारभार सुरू असून, जनतेचे गाऱ्हाणे ऐकले जात नसल्याची टीका माझी नगरसेवक अनंत सुतार यांनी केली. नवी मुंबई शहरातून महावितरणला सर्वांत जास्त उत्पन्न वीजबिलामधून मिळते त्या नवी मुंबईतील ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे असल्याचा आरोप माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला. कोरोना काळात महावितरणकडून ग्राहकांना वीजबिल वेळेवर देण्यात आली नाहीत त्याचा भुर्दंड मात्र ग्राहकांवर टाकण्यात आला महावितरणची चूक असताना ग्राहकांनी हा भुर्दंड का भरावा? असा सवाल माजी महापौर जयवंत सुतार यांनी केला. वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या वीजबिल वसुलीमुळे नवी मुंबई भाजपतर्फे शहरातील सर्वच नोडमध्ये शुक्रवारी महाविकास आघाडी सरकाराच्या विरोधात निषेध आंदोलने करण्यात आली. या पत्रकार परिषदेला माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलक कार्यकर्त्यांचा सन्मानआमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील वेळेस झालेल्या वीज आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्या कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषदेमध्ये सन्मान करण्यात आला. जनतेवरील अन्याय नाहीसा करण्यासाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी बेल न घेता तुरुंगात जाण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यानी दिली.

टॅग्स :electricityवीजbillबिलBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई