शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आमचे नेते आम्हीच, त्यांचा बुरखा फाडणार

By नारायण जाधव | Updated: June 5, 2023 10:02 IST

मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करून त्याची जबाबदारी १९७० मध्ये सिडकोवर सोपवली.

- नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

आमचे नेते आम्हीच असून सिडको, जेएनपीटी, एमआयडीसीने कोणाशीही संवाद साधू नये, पत्रव्यवहार करू नये, स्वयंघोषित प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांशी प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या, कामांबाबत चर्चा करू नये, असे रणशिंग नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांनी फुंकले आहे. याबाबतची सुरुवात त्यांनी लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या नावाखाली सिडकोला पत्र देऊन केली आहे. उशिरा का होईना खऱ्या प्रकल्पग्रस्तांना आपल्या ढोंगी, मतलबी आणि स्वार्थी लबाड नेत्यांचे कारनामे माहीत झाल्याने त्याचे स्वागत होत आहे.

मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करून त्याची जबाबदारी १९७० मध्ये सिडकोवर सोपवली. यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांंतील ९५ गावांतील ३४४ चौरस किलोमीटर जमीन संपादित केली. त्याआधी १९६४ मध्ये टीटीसी एमआयडीसी आली. ठाणे खाडीवर रेल्वे आणि रस्ते पुलाची उभारणी झाली. तेव्हापासून नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसराच्या विकासाने गती पकडली. यात उपनगरीय लोकल आणि जेएनपीटी बंदरासह पनवेलनजीक तळोजा-रसायनीत एमआयडीसी आल्यानंतर तर या भागाचा चेहरामोहरा बदलला. परंतु, ज्यांच्या जमिनीवर हा सर्व विकास झाला, ते मूळचे शेतकरी मात्र आहे तिथेच राहिले. 

नाही म्हणायला १९८० च्या दशकात प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या लढ्यामुळे निदान सिडकोने साडेबारा टक्के योजनेद्वारे विकसित भूखंड तरी दिले. त्यानंतर मात्र प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. परंतु, यात दि. बा. यांच्यासोबत जे ढोंगी नेते सहभागी होते, त्यांनी मात्र सिडको, जेएनपीटी, एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संगनमत करून विविध कंत्राटे पदरात पाडून, शिक्षण संस्था काढून, क्रीडा संकुले उभारून आपला भरमसाट विकास करून घेतला. यात कुणी आता शेठ, तर कुणी भाई, दादा, नाना नावाने ओळखले जाते. कुणी आमदार, कुणी खासदार तर कुणी मंत्री झाले. काही उपऱ्या पुढाऱ्यांनीही या स्वार्थी नेत्यांच्या हातात हात घालून आपला विकास करून घेतला. परंतु, खरा प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागला आहे. हे कथित नेते मात्र स्वत: कोणत्याही पक्षात असले तरी एकमेकांना ‘राम, राम’ म्हणत दिवसा पक्षीय राजकारण करून रात्रीच्या अंधारात एकमेकांचे ‘प्रीतम’ बनून भागीदारीत अब्जावधीची कंत्राटे लाटत आहेत. 

विमानतळ, मुंबई-गोवा महामार्गापासून रेल्वे मार्गाच्या कंत्राटांचा धांडोळा घेतला तरी त्यांचे बिंग फुटेल. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणेपासून ते जमीन संपादन प्रक्रिया, पुनर्वसन पॅकेजपर्यंत प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडण्यासाठी अनेक संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांची आंदोलने सुरू आहेत. यात हे ठेकेदार झालेले कथित नेतेही आहेत. परंतु, आता त्यांच्याशिवाय लढा उभारण्याचा निर्णय या २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीने घेतला आहे.

जनआंदोलन व्हावे 

आम्ही केवळ संघटना म्हणून प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधित्व करत नसून विमानतळात बाधित ओवळे, दापोली, पारगाव, कुंडेवहाळ, उलवे आणि चिंचपाडा ग्रामपंचायतीही संघटनेशी सहमत आहेत. त्यामुळे सिडकोने या ग्रामपंचायतींशी संपर्क साधून निर्णय घ्यावेत, अशी मागणी कृती समितीने केली आहे. परंतु, संघटनेने आता हे आंदोलन केवळ या सात-आठ गावांपुरते मर्यादित न ठेवता मूळची ९५ गावे, जेएनपीटीबाधित गावे, विरार-अलिबाग कॉरिडाॅर, गॅस पाइपलाइन गृहित धरून आपला लढा तीव्र करायला हवा, अशी अनेकांची सूचना आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ