शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

आमचे नेते आम्हीच, त्यांचा बुरखा फाडणार

By नारायण जाधव | Updated: June 5, 2023 10:02 IST

मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करून त्याची जबाबदारी १९७० मध्ये सिडकोवर सोपवली.

- नारायण जाधव, उप-वृत्तसंपादक

आमचे नेते आम्हीच असून सिडको, जेएनपीटी, एमआयडीसीने कोणाशीही संवाद साधू नये, पत्रव्यवहार करू नये, स्वयंघोषित प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांशी प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या, कामांबाबत चर्चा करू नये, असे रणशिंग नवी मुंबईतील प्रकल्पगस्तांनी फुंकले आहे. याबाबतची सुरुवात त्यांनी लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या नावाखाली सिडकोला पत्र देऊन केली आहे. उशिरा का होईना खऱ्या प्रकल्पग्रस्तांना आपल्या ढोंगी, मतलबी आणि स्वार्थी लबाड नेत्यांचे कारनामे माहीत झाल्याने त्याचे स्वागत होत आहे.

मुंबई शहरावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती करून त्याची जबाबदारी १९७० मध्ये सिडकोवर सोपवली. यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांंतील ९५ गावांतील ३४४ चौरस किलोमीटर जमीन संपादित केली. त्याआधी १९६४ मध्ये टीटीसी एमआयडीसी आली. ठाणे खाडीवर रेल्वे आणि रस्ते पुलाची उभारणी झाली. तेव्हापासून नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसराच्या विकासाने गती पकडली. यात उपनगरीय लोकल आणि जेएनपीटी बंदरासह पनवेलनजीक तळोजा-रसायनीत एमआयडीसी आल्यानंतर तर या भागाचा चेहरामोहरा बदलला. परंतु, ज्यांच्या जमिनीवर हा सर्व विकास झाला, ते मूळचे शेतकरी मात्र आहे तिथेच राहिले. 

नाही म्हणायला १९८० च्या दशकात प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या लढ्यामुळे निदान सिडकोने साडेबारा टक्के योजनेद्वारे विकसित भूखंड तरी दिले. त्यानंतर मात्र प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. परंतु, यात दि. बा. यांच्यासोबत जे ढोंगी नेते सहभागी होते, त्यांनी मात्र सिडको, जेएनपीटी, एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संगनमत करून विविध कंत्राटे पदरात पाडून, शिक्षण संस्था काढून, क्रीडा संकुले उभारून आपला भरमसाट विकास करून घेतला. यात कुणी आता शेठ, तर कुणी भाई, दादा, नाना नावाने ओळखले जाते. कुणी आमदार, कुणी खासदार तर कुणी मंत्री झाले. काही उपऱ्या पुढाऱ्यांनीही या स्वार्थी नेत्यांच्या हातात हात घालून आपला विकास करून घेतला. परंतु, खरा प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागला आहे. हे कथित नेते मात्र स्वत: कोणत्याही पक्षात असले तरी एकमेकांना ‘राम, राम’ म्हणत दिवसा पक्षीय राजकारण करून रात्रीच्या अंधारात एकमेकांचे ‘प्रीतम’ बनून भागीदारीत अब्जावधीची कंत्राटे लाटत आहेत. 

विमानतळ, मुंबई-गोवा महामार्गापासून रेल्वे मार्गाच्या कंत्राटांचा धांडोळा घेतला तरी त्यांचे बिंग फुटेल. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोषणेपासून ते जमीन संपादन प्रक्रिया, पुनर्वसन पॅकेजपर्यंत प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडण्यासाठी अनेक संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांची आंदोलने सुरू आहेत. यात हे ठेकेदार झालेले कथित नेतेही आहेत. परंतु, आता त्यांच्याशिवाय लढा उभारण्याचा निर्णय या २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीने घेतला आहे.

जनआंदोलन व्हावे 

आम्ही केवळ संघटना म्हणून प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधित्व करत नसून विमानतळात बाधित ओवळे, दापोली, पारगाव, कुंडेवहाळ, उलवे आणि चिंचपाडा ग्रामपंचायतीही संघटनेशी सहमत आहेत. त्यामुळे सिडकोने या ग्रामपंचायतींशी संपर्क साधून निर्णय घ्यावेत, अशी मागणी कृती समितीने केली आहे. परंतु, संघटनेने आता हे आंदोलन केवळ या सात-आठ गावांपुरते मर्यादित न ठेवता मूळची ९५ गावे, जेएनपीटीबाधित गावे, विरार-अलिबाग कॉरिडाॅर, गॅस पाइपलाइन गृहित धरून आपला लढा तीव्र करायला हवा, अशी अनेकांची सूचना आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ