शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 00:30 IST

नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

- वैभव गायकरपनवेल : नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असून, याविषयी जनजागृती करण्यासाठी नैनिताल येथील पर्यावरणप्रेमी भूपेंद्र मेहरा यांनी सायकलवरून भारतभ्रमण सुरू केले आहे.२०१३ साली उत्तराखंड या ठिकाणी देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जलप्रलय आला होता. निसर्गावर मात करत मानवाने पर्यावरणाचे संकट आपल्यावर ओढवल्याने सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०१८ मध्ये केरळ राज्यातदेखील जलप्रलय झाले. देशभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला मोठी हानी पोहोचवली जात आहे. जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत, खाडीकिनारी भराव टाकला जात आहे आदीसह विविध बाबींमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, नैनिताल येथील भूपेंद्र मेहरा यांनी पर्यावरणाचे रक्षण या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास सुरू केला आहे. नुकतेच ते पनवेलमध्ये दाखल झाले होते. दररोज ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात. सायकलवर, ‘आवो सब मिलकर पर्यावरण बचाये, इस धरती को हरभरा बनाये’ हा संदेश एका पाटीवर कोरला आहे. नैनिताल हलदानी या ठिकाणाहून सुरू केलेल्या प्रवासादरम्यान भूपेंद्र सिंग मेहरा यांनी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील विविध शहरांमधून मार्ग काढत गोवा या ठिकाणी दाखल होणार आहेत. भूपेंद्र यांनी अशाप्रकारच्या आठ सायकल रॅली यापूर्वी देशभरात काढलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :panvelपनवेल