शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस

By नारायण जाधव | Updated: January 13, 2024 19:07 IST

अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.

नवी मुंबई: न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतूमुळे केवळ मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरेच जवळ येणार नसून सिडको आणि एममएआरडीएने प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या नवी मुंबईसह सिडकोचे नैना क्षेत्र आणि पुणे, रायगड जिल्ह्यासह कोकण आणि गोवा मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. हा सागरी सेतू प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोकण ग्रीनफील्ड हायवेसह विद्यमान मुंबई-गोवा, मुंबई- पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास चिर्ले येथूनच जोडला आहे. याशिवाय कोकण ग्रीनफील्ड हायवेचाच एक भाग असलेला रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील सागरी सेतूची निविदा प्रक्रिया रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच सुरू आहे. ते करंजा या धरमतर खाडीवरील सागरी सेतूमुळे अलिबाग ते मुंबईचे अंतर अवघ्या ४० मिनिटांवर येणार आहे. यामुळे अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.

तिसरी मुंबई, ग्रोथ सेंटरला होणार लाभन्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतूच्या परिघात सिडकोने पूर्वी खोपटा नवनगर शहर प्रस्तावित केले होते. मात्र, या खोपटा नवनगरसह एमएमआरडीएने नैना क्षेत्रातील काही गावे मिळून तिसरी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे, तर एमएमआरडीएने पेणनजीक ऑरेंज सिटी नावाचे ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. याशिवाय पनेवल-पेण-अलिबाग-कर्जत पट्ट्यात अनेक खासगी विकासकांच्या टाऊनशिप आकार घेत आहेत. 

मुंबई, नवी मुंबईच्या तुलनेत या भागात घरे स्वस्त असल्याने या सागरी सेतूमुळे तेथील रहिवासी, उद्योजकांची मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक जवळ येणार आहे. श्रीवर्धन-म्हसळा-रोहा परिसरातील प्रस्तावित औद्योगिकनगरीस त्याचा लाभ होणार आहे. कोकण-गोवा दोन तासाने अंतर कमी होणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोकण ग्रीनफील्ड हायवेसह विद्यमान मुंबई-गोवा, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास चिर्ले येथूनच जोडला जाणार आहे. सध्या चिर्ले जंक्शनचे काम जोमात सुरू आहे. यामुळे नैना, रायगड-पुणे-गोवाचे मुंबईमधील अंतर किमान दोन तासांनी कमी होऊन हा पट्टाही मुंबईच्या अधिक नजीक येणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईsewri nhava shevaशिवडी - न्हावा शेवा अटल सेतू