शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बेलापूरमधून नाईकांचा मार्ग खडतर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:04 AM

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे राजन विचारे यांना जवळपास ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

- कमलाकर कांबळेराष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे राजन विचारे यांना जवळपास ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विशेषत: माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातून विचारे यांना ४० हजारांची आघाडी मिळाली आहे. मतांची ही आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धडकी भरविणारी आहे. विशेषत: विचारे यांचे मताधिक्य राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांना धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. बेलापूर मतदारसंघातून विचारे यांनी तब्बल ३५ हजार मतांची आघाडी घेतली होती. या वेळी त्यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मागील पाच वर्षांत बेलापूरमध्ये युतीची ताकद वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत बेलापूर विधानसभा क्षेत्रातून गणेश नाईक यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव झाला होता. ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आपली सत्ता राखली; परंतु विधानसभेतील पराभव त्यांच्या जिव्हारीचा लागला. त्यामुळे मागील साडे चार वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनातून फारकत घेतल्याचे दिसून आले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी दुर्मीळ झाल्याने जनसामान्यांवरील त्यांची पकड सैल झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबोला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याचा प्रभाव सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतही जाणवणार आहे. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरतील यात काही वाद नाही.मागील पाच वर्षांत गणेश नाईकच नव्हे, तर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक, आमदार संदीप नाईक तसेच महापौर राहिलेले त्यांचे पुतणे सागर नाईक हेसुद्धा मागील पाच वर्षांत जनतेत फारसे रमताना दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांची संभ्रमावस्था झाली आहे. याचाच फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना बसला. संजीव नाईक किंवा स्वत: निवडणूक न लढता गणेश नाईक यांनी आनंद परांजपे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. उमेदवार आनंद परांजपे असले तरी निवडणूक मीच लढवित आहे, असे सांगत त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला; परंतु प्रचाराची अपेक्षित उंची गाठता आली नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी सूर आवळणारी काँग्रेससुद्धा या वेळी नाईकांच्या हाकेला धावून आली; परंतु मतदारांवर त्याचाही फारसा प्रभाव पडला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबाबत यापेक्षा वेगळी परिस्थिती नसणार आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांचा अजेंडा त्यांच्या निवडणूक प्रचारात होता; परंतु मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे शहरातील विकासकामांनाही खीळ बसली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची, हा मोठा प्रश्न नाईक यांना सतावणार आहे. आमदार झाल्यानंतर मंदा म्हात्रे या विविध पद्धतीने बेलापूर विधानसभा क्षेत्रात आपला प्रभाव वाढविण्यात यशस्वी झाल्या आहेत. शिवाय शिवसेनेचीही ताकद वाढल्याचे लोकसभा निवडणुकीतील मतदानांवरून स्पष्ट झाले आहे.>२0१४ च्या निवडणुकीतीलमतांचा घोषवारालोकसभेच्या मागील निवडणुकीत राजन विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून ९०,९८६ मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना ६५,२०२ मतांवर समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघातून विचारे यांनी २५,७८४ मतांची आघाडी घेतली होती.>मागील विधानसभा निवडणुकीचा आढावाविधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली होती. बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे ५५,३१६ तर शिवसेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ इतकी मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांना ५३,८१६ इतकी मते मिळाली होती. या वेळी लोकसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार राजन विचारे यांना मिळालेली मतांची आघाडी यामुळे या वेळेची विधानसभा निवडणूक नाईक यांना सोपी नाही, असाच राजकीय अंदाज आहे.