शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पालिकेमध्ये १५ घराण्यांचे वर्चस्व, चार कुटुंबांत प्रत्येकी तीन नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:03 IST

सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमध्ये प्रत्येकी तीन व दहा घरांमध्ये दोन नगरसेवक असून, सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ लागली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : महानगरपालिकेच्या तीन दशकांच्या वाटचालीमध्ये प्रत्येक विभागामध्ये राजकीय घराणी तयार झाली आहेत. १५ घराण्यांचा पालिकेच्या राजकारणावर वरचष्मा राहिला आहे. सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमध्ये प्रत्येकी तीन व दहा घरांमध्ये दोन नगरसेवक असून, सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ लागली आहे.सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी केल्यानंतर १९९२ मध्ये शासनाने महानगरपालिकेची स्थापना केली. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेमध्ये रूपांतर झालेले हे एकमेव शहर. १९९५ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये महापालिकेची सत्ता विशिष्ट घराण्यांभोवती फिरत राहिली आहे. माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या परिवाराचे शहराच्या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी याच घरात मंत्री, दोन आमदार, खासदार व महापौर ही प्रमुख पदे होती, यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीची टीका करण्यास सुरुवात केली होती; पण अशाप्रकारची घराणेशाही सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये तयार झाली आहे. पालिकेमध्ये आतापर्यंत १५ घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे.सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमधील प्रत्येकी तीन नगरसेवक कार्यरत असून, दहा घरांमधील प्रत्येकी दोन नगरसेवक महापालिकेमध्ये कार्यरत आहेत. या वेळच्या निवडणुकीमध्येही काही ज्येष्ठ पदाधिकारी व नगरसेवकांनी स्वत:च्या घरामध्ये दोन ते चार तिकिटे मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.राजकीय घराणेशाहीमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ लागला आहे. पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करायचे. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे व शेवटी तिकीट नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घरामध्येच दिले जात आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येऊ लागली आहे. या निवडणुकीमध्येही जास्तीत जास्त तिकिटे स्वत:च्या नातेवाइकांना मिळावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.>तुर्भेमधील पाटील कुटुंबीयनवी मुंबईच्या व महानगरपालिकेच्या राजकारणावर तुर्भेमधील डी. आर. पाटील कुटुंबीयांचेही वर्चस्व राहिले आहे. स्वत: डी. आर. पाटील स्थायी समितीचे सभापती होते. त्यांचे बंधू भोलानाथ पाटील उपमहापौर होते. दोन्ही नेत्यांच्या निधनानंतरही या परिवारातील सदस्य सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. आतापर्यंत बेबीताई पाटील, विवेक पाटील, चंद्रकांत पाटील नगरसेवक होते. सद्यस्थितीमध्ये शुभांगी पाटील व शशिकला पाटील नगरसेविका आहेत. शुभांगी पाटील यांनी स्थायी समितीचे सभापतिपदही भूषविले आहे.>नाईक कुटुंबनवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक परिवाराचे वर्चस्व आहे. सद्यस्थितीमध्ये नाईक परिवारातील वैशाली नाईक या एकमेव नगरसेविका आहेत; परंतु यापूर्वी संजीव नाईक व सागर नाईक यांनी महापौरपद व संदीप नाईक यांनी सलग तीन वर्षे स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे.>नवी मुंबई महापालिकेतील राजकीय घराणी>विजय चौगुलेशिवसेनेचे नेते विजय चौगुले यांच्या कुटुंबीयांचेही महापालिकेच्या राजकारणामध्ये वर्चस्व आहे. स्वत: चौगुले, त्यांचा मुलगा ममित चौगुले नगरसेवक आहेत. त्यांचे नातेवाईक आकाश मढवी हेही नगरसेवक आहेत.>एम. के. मढवीऐरोलीमधील नगरसेवक एम. के. मढवी हे स्वत: नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी विनया मढवी व मुलगा करण मढवी हेही नगरसेवक आहेत. जवळपास दोन दशकांपासून मढवी यांचा ऐरोली परिसरामध्ये प्रभाव आहे. पूर्वी दोन प्रभागांमध्ये त्यांच्या परिवारातील सदस्य निवडून येत होते. मागील निवडणुकीमध्ये तीन सदस्य निवडून आले आहेत.>नवीन गवतेस्थायी समिती सभापती नवीन गवते यांचा दिघा परिसरावर प्रभाव आहे. दहा वर्षांपूर्वी गवते कुटुंंबामधील एक सदस्य महापालिकेमध्ये होता. सद्य:स्थितीमध्ये त्यांच्या घरातील तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत.>सुधाकर सोनावणेमाजी महापौर सुधाकर सोनावणे यांचेही रबाळेमधील एमआयडीसी परिसरामध्ये वर्चस्व आहे. ते २० वर्षांपासून निवडून येत आहेत. त्यांची पत्नीही नगरसेविका असून, यापूर्वी मुलगीही नगरसेविका होती.>प्रशांत पाटीलघणसोलीमधील प्रशांत पाटील यांनीही या परिसरामध्ये दबदबा निर्माण केला आहे. ते स्वत:, आई व पत्नीही नगरसेविका आहेत. त्यांनी यापूर्वी शिक्षण मंडळ सदस्य म्हणूनही काम केले आहे.>शिवराम पाटीलकोपरखैरणेमध्ये शिवराम पाटील हे २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समिती सभापतिपदही भूषविले असून त्यांच्या पत्नीही नगरसेविका आहेत.>दशरथ भगतवाशी विभागामध्ये दशरथ भगत यांचा प्रभाव आहे. ते स्वत: यापूर्वी नगरसेवक व विरोधी पक्षनेतेही होते. सद्य:स्थितीमध्ये त्यांची पत्नी व परिवारातील इतर दोन, असे तीन नगरसेवक त्यांच्या घरातील आहेत.>सुरेश कुलकर्णीनवी मुंबई महापालिकेमध्ये नाईक परिवारातील संदीप नाईक वगळता फक्त सुरेश कुलकर्णी यांनाच तीन वेळा स्थायी समिती सभापती होता आले आहे. परिवहन सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे, त्यांच्या पत्नीही नगरसेविका आहेत.>सोमनाथ वास्करसानपाडामधून सोमनाथ वास्कर व त्यांच्या पत्नी कोमल वास्कर निवडून आल्या आहेत. दोघेही प्रत्येकी दहा वर्षे महापालिकेमध्ये आहेत. वास्कर यांनी यापूर्वी शिक्षण मंडळ सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.>अशोक गावडेरााष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष अशोक गावडे व त्यांची मुलगी स्वप्ना गावडे महापालिकेत नगरसेवक म्हणून आहेत. गावडे यांची पत्नीही यापूर्वी नगरसेविका होत्या. अशोक गावडे यांनी यापूर्वी उपमहापौरपदही भूषविले आहे.>लक्ष्मीकांत पाटीलघणसोली परिसरामध्ये लक्ष्मीकांत पाटील यांनीही त्यांचा प्रभाव वाढविण्यास सुरुवात केला आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या घरातील एक सदस्य होते. आता दोन सदस्य महापालिकेमध्ये आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई