शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:56 IST

नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने फेरीवाल्यांकडून रहदारीचे प्रमुख रस्ते, तसेच खेळाची मैदाने व्यापली जात आहेत. मात्र, अशा आठवडे बाजारांमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडले असून, गुन्हेगारीवाढीलाही ते कारणीभूत ठरत आहेत.शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरणारे आठवडे बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. ग्रामीण भागातील गरजेची आठवडे बाजाराची ही पद्धत शहरी भागात केवळ अर्थकारणासाठी वापरली जात आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून एका दिवशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता आठवडे बाजार भरवले जातात. त्या ठिकाणी शेतीच्या आवश्यक साधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू, भाजेपाल्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. मात्र, शहरी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने, बाजारपेठा उपलब्ध असल्याने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या गरजा कोणीही सहज भागवू शकतो. त्याकरिता आठवडे बाजाराची आवश्यकता नसतानाही, केवळ काही व्यक्तींच्या पुढाकारातून ते भरवले जात आहेत. त्याकरिता गाव-गावठाणांतील रस्ते, खेळाची मैदाने या ठिकाणी फेरीवाले बसवले जात आहेत. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १००० रुपये भाडे संबंधित व्यक्तीकडून आकारले जात असल्याचेही समजते. तर बाजारात अधिकाधिक फेरीवाले बसावेत, याकरिता शहराबाहेरून फेरीवाल्यांना निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने गुन्हगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीही शहरात फेरफटका मारत आहेत.काही दिवसांपूर्वी मच्छीविक्रेते बनून आलेल्या टोळीने सानपाडा येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; परंतु ज्याच्या घरासमोर बाजार भरवला जातो, त्यांनाही संबंधितांकडून रसद पुरवली जात असल्याचे बोलले जात आहे; परंतु संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास इतर नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अशा वेळी वादाचे प्रकार घडत असून, त्याचे पडसाद हाणामारीतही उमटत आहेत.