शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:56 IST

नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई : नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने फेरीवाल्यांकडून रहदारीचे प्रमुख रस्ते, तसेच खेळाची मैदाने व्यापली जात आहेत. मात्र, अशा आठवडे बाजारांमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडले असून, गुन्हेगारीवाढीलाही ते कारणीभूत ठरत आहेत.शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरणारे आठवडे बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. ग्रामीण भागातील गरजेची आठवडे बाजाराची ही पद्धत शहरी भागात केवळ अर्थकारणासाठी वापरली जात आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून एका दिवशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता आठवडे बाजार भरवले जातात. त्या ठिकाणी शेतीच्या आवश्यक साधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू, भाजेपाल्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. मात्र, शहरी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने, बाजारपेठा उपलब्ध असल्याने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या गरजा कोणीही सहज भागवू शकतो. त्याकरिता आठवडे बाजाराची आवश्यकता नसतानाही, केवळ काही व्यक्तींच्या पुढाकारातून ते भरवले जात आहेत. त्याकरिता गाव-गावठाणांतील रस्ते, खेळाची मैदाने या ठिकाणी फेरीवाले बसवले जात आहेत. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १००० रुपये भाडे संबंधित व्यक्तीकडून आकारले जात असल्याचेही समजते. तर बाजारात अधिकाधिक फेरीवाले बसावेत, याकरिता शहराबाहेरून फेरीवाल्यांना निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने गुन्हगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीही शहरात फेरफटका मारत आहेत.काही दिवसांपूर्वी मच्छीविक्रेते बनून आलेल्या टोळीने सानपाडा येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; परंतु ज्याच्या घरासमोर बाजार भरवला जातो, त्यांनाही संबंधितांकडून रसद पुरवली जात असल्याचे बोलले जात आहे; परंतु संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास इतर नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अशा वेळी वादाचे प्रकार घडत असून, त्याचे पडसाद हाणामारीतही उमटत आहेत.